Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कियारामुळं तुटणार होता अशनीर ग्रोव्हर यांचा संसार, घटस्फोटापर्यंत पोहोचलेलं प्रकरण

26

मुंबई: बॉलिवूडमधलं स्टार कपल कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. आजपासून लग्नापूर्वीच्या सोहळ्यांना सुरुवातही झाली आहे. हा एक शाही विवाहसोहळा असणार आहे, यात काही शंका नाही. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी कियारा-सिद्धार्थच्या लग्नासाठी जयपूरला पोहोचले आहेत. कियारा तिच्या लग्नामुळं तर चर्चेत आहेत, पण तिच्याबद्दलच्या इतर अनेक गोष्टीही चर्चेत आल्यात.

एक म्हणजे शार्क टॅंक इंडियाच्या पहिल्या सीझनमधील शार्क अशनीर ग्रोव्हर यांनी केलेला खुलासा. त्यांनी एकदा असा खुलासा केला होताकी, कियारा अडवाणीमुळं त्यांचा घटस्फोट होता होता राहिला होता.

नेव्हीमध्ये होते कियाराचे सासरे तर सिद्धार्थची सासू शिक्षिका, कोण आहे मल्होत्रा-आडवाणी कुटुंबात?
अशनीर गोवर यांनी त्यांच्या ‘दोगलापन’ या पुस्तकात याबद्दलचा एक किस्सा शेअर केला आहेत. किरायामुळं त्यांचा आणि त्यांच्या बायकोचा घटस्फोट होणार होता. पुस्तकात अशनीर यांनी त्यांच्या ऑफिसमधील एक मित्र आणि एक सहसंस्थापक अशा दोघांना भेटण्यासंदर्भातला एक किस्सा सांगितलाय.

अशनीर यांनी त्या मित्राला लग्नाविषयी विचारलं तेव्हा त्या मित्रानं त्यांना एका मॅचमेकर विषयी माहिती दिली. इंडियन मॅचमेकिंगमधल्या सीमा आंटी सारखंच तो मॅचमेकर त्या मित्रासाठी काम करायचा. अशनीर यांनी त्या लग्नजुळवणाऱ्या मॅचमेकरला पुढच्या प्लॅनिंगबद्दल विचारलं तेव्हा, त्यानं परफेक्ट जोडीदार म्हणून कियारा अडवाणीचं स्थळ सुचवलं होतं. हा घडलेला किस्सा जेव्हा अशनीर यांनी त्यांच्या आईला सांगितलं तेव्हा ते सहज म्हणाले होते की , माझ लग्न आता झालं असतं तर माझ्यासाठीही कियारा अडवाणीचं स्थळ आलं असतं, जसं माझ्या मित्राला आलं.
https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/sidharth-malhotra-kiara-advani-wedding-bells-know-their-love-story/articleshow/97619970.cms
अशनीर यांनी हे गंमतीनं म्हणटलं होतं. पण त्यांची पत्नी माधुरी यांना मात्र वेगळंच वाटलं. त्या प्रचंड अस्वस्थ झाल्या. पुढच्या दिवशी ते विमानानं मुंबईला जात असताना, फ्लाइटमध्ये दोघांचं जबरदस्त भांडणही झालं होतं. माधुरी यांनी अशनीर यांची चांगलीच शाळा घेतली होती. खरंच कियारा अडवाणीसोबत लग्न करायचं आहे का?वगैरे वगैरे..असे अनेक प्रश्न माधुरी अशनीर यांना विचारत होत्या. आणि अशनीर फक्त शांत होते..असा हा किस्सा सध्या चर्चेत आलाय.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.