Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
काय आहे प्रकरण?
आलियानं नवाजवर आरोप केल्यानंतर चर्चेला उधाण आलं होतं. आता त्याच्या वकिलांनीही आलियावर आरोप केल्यानं पुन्हा चर्चा सुरू झाल्यात. आलियावर करण्यात आलेल्या आरोपांनी सगळ्यांना बुचकळ्यात टाकलं आहे.
काय आहे आलियावर आरोप?
आलियानं २०११मध्ये नवाजुद्दीनसोबत लग्न केलं होतं. पण आलियानं पहिल्या पतीकडून अद्यापही घटस्फोट घेतला नाही. त्यामुळं नवाजसोबत लग्न केल्यानंतरही आलियाचे पहिल्या नवऱ्यासोबत म्हणजेच विनय भार्गव याच्यासोबत संबंध होते, असा आरोप नवाजच्या वकिलांकडून आलियावर करण्यात आलाय. पत्रकार परिषदेत नवाजच्या वकिलांनी अनेक गोष्टीवर भाष्य केलंय.
नवाजचे वकिल नेमकं काय म्हणाले…?
आठवी नापास आलिया उर्फी अजंली कुमारी हिनं विनय भार्गव याच्याशी लग्न केलं. त्यानंतर ती मुंबईत आली. तिनं तिचं नाव बदलून अंजना पांड्ये ठेवलं. त्यानंतर तिनं पुन्हा नाव बदलून अंजना आनंद केलं. इतकंच नाही तर काही दिवसांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि पुन्हा नाव बदललं. धर्म बदलल्यानंतर ती जैनब अशी ओळख सांगायचीय २०११मध्ये तिनं नवाजुद्दीनसोबत लग्न केलं. त्यानंतर दोघांमध्ये सतत वाद होत असतं. २०२२मध्ये तिनं नवाजला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती, पण त्याला काहीच अर्थच नव्हता. इतकंच नाही तर आलियाच्या शाळेच्या रिझल्टवर तिची जन्मतारीख एक आहे आणि पार्टपोर्टवर वेगळी आहे.
नवाजच्या वकिलांनी आलियावर केलेल्या या आरोपांमुळं तर्चेला एकचं उधाण आलं आहे.