Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
श्रीराम नवमीचा शुभ मुहूर्त
चैत्र शुद्ध नवमी प्रारंभ – २९ मार्च रोजी रात्री ९ वाजून ७ मिनिटे ते
चैत्र शुद्ध नवमी समाप्ती – ३० मार्च रोजी रात्री ११ वाजून २९ मिनिटे.
पूजनाचा मुहूर्त – ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटे ते दुपारी १ वाजून ३० मिनिटे.
१२ वाजून ३० मिनिटे ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत अभिजीत मुहूर्त असेल. ज्यामध्ये पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतील.
श्रीराम नवमी शुभ योग
यावेळी रामनवमी गुरुवारी ३० मार्च रोजी ५ शुभ योगांमध्ये साजरी होणार आहे. यावेळी रामनवमीला गुरु पुष्य योग, अमृत सिद्धी योग, रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग आणि गुरु योग यांचा संयोग साधला जात आहे. रामनवमीच्या दिवशी या पाच योगांच्या उपस्थितीने श्रीरामाची पूजा फलदायी ठरेल. या दिवशी केलेल्या कामात यश मिळेल. गुरु पुष्य योग आणि अमृत सिद्धी योग ३० मार्च रोजी सकाळी १० वाजून ५९ मिनिटांनी प्रारंभ होईल आणि ३१ मार्च सकाळी ६ वाजून १३ मिनिटापर्यंत राहील. गुरु योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोग सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राहील. रामनवमीच्या दिवशी या पाच योगांच्या संयोगात श्रीरामाची आराधना केल्याने संकटांपासून मुक्ती मिळून संततीसुख प्राप्त होऊ शकते.
श्रीराम नवमी पूजाविधी
राम नवमीचा पूजाविधी नवमी तिथी प्रारंभ झाल्यावर नेहमीप्रमाणे सुचिर्भूत व्हावे. प्रभू श्रीरामांची प्रतिमा किंवा श्रीरामांची मूर्ती एका चौरंगावर स्थापन करावी. श्रीराम पूजनाचा संकल्प करावा. श्रीरामांचे आवाहन करून पंचामृताचा अभिषेक करावा. यानंतर मुख्य अभिषेक करावा. अभिषेकानंतर हळद-कुंकू, चंदन, फुले अर्पण करावीत. यानंतर धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. आरती करावी. मनापासून नमस्कार करून श्रीरामांचे शुभाशीर्वाद घ्यावेत. पूजा झाल्यानंतर रामचरितमानस, रामरक्षा आणि शक्य असल्यास रामायणाचे पारायण करावे. व्रताचा संकल्प केलेल्यांनी दिवसभर केवळ फलाहार करावा. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून व्रताची सांगता करावी.
श्रीराम नवमी महत्व
श्रीरामांचे संपूर्ण जीवन एक आदर्श जीवन होते. देवाचा अवतार असले, तरी त्यांचे आयुष्य परीश्रमयुक्त असेच होते. मानवी जीवनाचे सर्व भोग श्रीरामांनी भोगले. राजा दशरथाचे ज्येष्ठ पुत्र असूनही वनवास त्यांना चुकला नाही. रावणाचा वध करण्यासाठी श्रीरामांचा जन्म झाला, असे सांगण्यात येते. राम नवमीला केलेल्या व्रतामुळे माणसाच्या मनोवांच्छित इच्छा पूर्ण होतात. रामरक्षा पठणाने सर्व कष्टांचे निवारण होते, असे मानले जाते. रामनवमीचा दिवस भक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण हा दिवस भगवान रामाची जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विष्णूचा अवतार असलेल्या भगवान श्री रामाची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. भक्तांच्या जीवनातून सर्व संकटे दूर होतात. या दिवशी पूजा केल्याने प्रभू श्रीरामासोबत आदिशक्तीचाही आशीर्वाद प्राप्त होतो.