Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘१९८७ साली गमरे हे शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांनी जवळपास साडेतीन दशकं शाळेत काम केल्याचे माजी विद्यार्थी सांगतात. मराठा हायस्कूलचे मुख्यध्यापक हेमंत गमरे यांच्या पत्नी ऋतुजा गमरेदेखील याच शाळेत शिक्षिका होत्या. गमरे या दाम्पत्यांनी मराठी हायस्कूल या शाळेत अनेक पिढ्या घडवल्या आहेत. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले अनेक विद्यार्थी उच्चपदावर आहेत. काही वर्षाआधी याच संस्थाचालकांनी शिक्षिका ऋतुजा गमरे यांच्यावरदेखील अशाच प्रकारे निलंबनाची कारवाई केली होती. केवळ राजकारणामुळे या दोन्ही शिक्षकांवर सूडाने कारवाई केली जात असल्याचा’ आरोप माजी विद्यार्थ्यांनी केला आहे. या कारवाईच्या विरोधात आंदोलन करणार असल्याची आजी माजी विद्यार्थी आणि पालकांची भूमिका आहे.
दुसरीकडे संचालक देवदास कदम हे शाळेचा संपुर्ण कारभार सांभाळतात. तसेच त्यांची पत्नी स्मिता कदम यादेखील याच शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. देवदास कदम हे मुंबई बॅंकेत कार्यकारी संचालक या पदावरदेखील कार्यरत आहेत. या संस्थाचालकांकडून जाणिवपूर्वक गमरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचा आरोप मुंबई विभागीय कॉंग्रेस कमिटी ब्लॉक क्रमांक १९५ चे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केला आहे.
मुख्याध्यापर गमरे यांच्यावरील कारवाई मागे घेण्यासंदर्भात शाळेला पत्र देण्यात आले होते. पण शाळेच्या संचालक मंडळाने याच्यावर कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यानंतर पुढील १५ दिवसांतच मुख्यध्यापक गमरे सरांवर निलंबनांची कारवाई करण्यात आल्याचे माजी विद्यार्थी सांगतात. काही पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश मागे घेऊन या घटनेचा निषेध नोंदविला आहे. भविष्यात या शाळेत एकही विद्यार्थी न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतल्याचे माजी विद्यार्थी सांगतात.
तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांसह स्थानिक वंचित बहुजन आघाडी, मुंबई विभागीय कॉंग्रेस कमिटी यांनी शाळेच्या संचालक मंडळाकडे निषेध नोंदविला आहे. शाळेच्या कारभाराविरोधात आणि हेमंत गमरे यांच्यावरील कारवाईविरोधात आंदोलन करत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण मुंबईचे सचिव निखिल चव्हाण यांनी सांगितले.
माजी विद्यार्थ्यांची शिष्टमंडळाशी बोलणे सुरू असताना गमरे सरांना निलंबित केला आहे. पहिली मागणी आमची अशी आहे की सरांचे निलंबन रद्द करा आणि हीच प्रमुख मागणी आहे. गमरे सरांवर अन्यायकारक निलंबन करण्यात आले आहे त्यांचे फक्त दोन वर्ष बाकी आहेत आणि त्यांना निलंबित केले आहे. एका मुख्याध्यापकांना निलंबित करणे ही माजी विद्यार्थ्यांसाठी खूप वाईट गोष्ट आहे म्हणून सर्व माजी विद्यार्थी गमरे सरांचे निलंबन मागे घेण्यासाठीएकत्रित येत असल्याची प्रतिक्रिया माजी विद्यार्थी संदीप प्रताप शिंदे यांनी दिली.