Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सत्ताबदलानंतर कर्नाटकमध्ये शालेय अभ्यासक्रमात बदल होण्याची शक्यता आहे. तसे संकेत राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांनी मंगळवारी दिले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि त्यांचे मन ‘दूषित’ होऊ नये, यासाठी लवकरच हा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप सत्तेवर असताना शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये करण्यात आलेले बदल पूर्ववत करण्याचे आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) रद्द करण्याचे आश्वासन काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. त्यासंदर्भात बोलताना, ‘एनईपी’ रद्द करण्याच्या नवीन सरकारच्या योजनांबाबत नागरिकांनी प्रतीक्षा करावी, असे मधु बंगारप्पा यांनी सांगितले. तथापि, ‘हिजाबबंदी’चे प्रकरण न्यायालयासमोर असल्याचे सांगून, ती मागे घेण्याबाबत कोणतीही टिप्पणी करण्यास त्यांनी नकार दिला.
‘मी काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचा उपाध्यक्ष होतो आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या हितासाठी अभ्यासक्रमात बदल केला जाईल, असे आम्ही जाहीरनाम्यात स्पष्ट सांगितले होते. विद्यार्थ्यांची मने दूषित होऊ नयेत, अशी आमची इच्छा आहे. विद्यार्थी शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात आणि त्यात अडथळा आणण्याची आमची इच्छा नाही, असेही आम्ही आधीच स्पष्ट केले होते. या संदर्भात सरकार, माझ्याकडून किंवा अधिकाऱ्यांकडून, यंत्रणेकडून कोणतीही चूक होणार नाही. तसे वचन आम्ही दिले आहे’, असे बंगारप्पा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्तावाढ
बेंगळुरू (कर्नाटक) : राज्यातील मुख्यमंत्री सिद्धरमय्या सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ केली आहे. आता हा भत्ता ३१ वरून ३५ टक्के इतका करण्यात आला आहे. राज्यातील पेन्शनधारकांनाही याचा लाभ होणार आहे. एक जानेवारी २०२३ पासून हा भत्ता मिळणार आहे.