Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भाजप लोकसभेत मुसंडी मारणार, कोणत्या राज्यात किती जागा मिळतील? प्रशांत किशोर यांची ‘आकडेवारी’

28

मुंबई – राजकीय रणनीतीकार म्हणून ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांनी लोकसभेच्या पाचव्या टप्प्यानंतर मतदारांचा कौल लक्षात घेवून भाजप किती जागांवर जिंकेल यांचा अंदाज बांधला आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत भाजप ३०० जागांवर विजय मिळवेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. भाजपचा ४०० पार चा नारा सत्यात उतरणे अशक्य आहे असा किशोर यांनी अनुमान लावले आहे.

अजूनही मोदींची देशात लाट

भाजपने निवडणुकीच्या सुरुवातीलाच ‘४०० पार’चा नारा दिला तेव्हाच मला ते अशक्य वाटले होते असे मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणालेत. पण भाजप २७० पेक्षा खाली जाणार नाही तर उलट मोदींची लाट अजूनही आहे त्यामुळे भाजप ३०० चा आकडा गाठेल अशा किशोर यांना विश्वास आहे.गेल्या लोकसभेत मिळालेल्या जागांपेक्षा यंदा जास्त जागांवर भाजपला बहुमतांचा आकडा मिळेल असे किशोर यांना वाटते.
अमित शहांनी केलेल्या दाव्याने विरोधकांच्या पोटात गोळा आला; म्हणाले, पाच टप्प्यांनंतर इतक्या जागांवर विजय निश्चित

दक्षिणेत भाजपला बहुमत मिळणार

प्रशांत किशोर यांच्यामते भाजपला दक्षिण आणि पुर्वेकडील राज्यात जास्त जागांवर यश मिळेल. यामध्ये तामिळनाडु, केरळ, तेलगांणा, आंध्रप्रदेश,बिहार, बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये जास्त जागा मिळतील असा किशोर यांचा अदांज आहे. तर राजस्थान आणि हरियाणामध्ये भाजपला साधारण ४ ते ५ जागांवर नुकसान होण्याची शक्यता किशोर यांनी वर्तवलीय.
Narendra Modi: कलम ३७० हद्दपार, राम मंदिर साकार; आता कशासाठी ४०० पार? मोदी सरकारचा प्लान काय?

महाराष्ट्र आणि युपीत भाजपला धक्का बसणार?

महाराष्ट्रात विरोधक मोठा आकडा गाठतील असा अंदाज बांधला जातोय, विरोधकांना साधारण २५ जागा मिळण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या २५ जागेवर विरोधकांना यश मिळाले तरी भाजपाचे नुकसान नसेल, कारण २०१९ मध्ये ४८ पैकी २३ जागांवर भाजपला यश मिळाले होते. यंदा महाराष्ट्रात साधारण २५ जागांवर जरी विरोधक जिंकले तरी भाजपला त्यांनी इतके नुकसान होणार नाही असे किशोर यांना वाटते. तर दुसरीकडे युपीत २०१९ च्या निवडणुकीत भाजपला जवळपास २५ जागांवर अपयश मिळाले होते. आता विरोधकांना असे वाटत असेल की या जागांमुळे भाजप अडचणीत येईल तर तसे नाही विरोधकांनी ४० जागांवर भाजपला धूळ चारली तर कुठेतरी भाजपला नुकसान होईल असे किशोर यांना वाटते.

पुन्हा मोदीत सत्तेत आले तर..

मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर राज्याकडे आर्थिक स्वातंत्र्यावर केंद्र सरकारकडून मर्यादा येण्याची शक्यता प्रशांत किशोर यांना बोलून दाखवली. मोदी सरकार स्थापित होताच कामांचा धडाका लावतील. सत्ता आणि बऱ्याच संसाधनांचे विकेंद्रीकरण होईल, तर काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील असे प्रशांत किशोर यांनी शक्यता वर्तवलीय.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.