Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कांचन वर्मा या महिला शेतकरी असून त्या नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या नर्मदापुरम जिल्ह्यात राहतात. त्यांनी गहू, तांदूळ, हरभरा या पारंपारिक पिकाला फाटा देत हळद या पिकाची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पादन घेतले आहे. आपल्या माहीत आहे की पंजाब हे देशातील सर्वात जास्त गहू पिकवणारे राज्य आहे. याच पंजाबचा प्रतिस्पर्धी म्हणून नर्मदापुरम जिल्ह्याची ओळख आहे. परंतु पारंपारिक पिक न घेता महिला शेतकरी कांचन वर्मा यांनी हळदीचे पिक घेण्याचं ठरवलं. आणि गहू, तांदूळ, हरभरा यातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नापेक्षा दुप्पट उत्पन्न मिळवलं.
२०२० मध्ये केली हळदीची लागवड
कांचन वर्मा यांनी २०२० मध्ये हळद लागवड करण्याचा निर्णय घेतला. निर्णय थोडा जोखमीचाच होता पण त्यांनी योग्य पद्धतीने हळद शेतीचा अभ्यास केला त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शनही घेतले. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात पिकावल्या जाणाऱ्या हळदीच्या जातीची लागवड त्यांनी लागवड केली. सांगलीची हळद ही औषधी गुणधर्मांसाठी श्रेष्ठ मानली जाते. या हळदीचा रंग गडद केशरी असतो. व पिकाचे उत्पादन सुद्धा जास्त प्रमाणात मिळते. याचाच फायदा कांचन वर्मा यांना झाला.
दीड लाखांच्या उत्पन्नावरुन थेट १२ लाखांचे उत्पन्न
कांचन वर्मा या हळद लागवड करण्यापूर्वी पारंपारिक पिकांची लागवड करून एकरी सुमारे दीड लाख रुपये कमावत होत्या. मात्र, हळद लागवडीमुळे त्यांचे उत्पन्न दुप्पट होऊन तीन लाख रुपये झाले आहे. २०२३ मध्ये कांचन यांनी ४०० क्विंटलचे भरघोस पीक घेतले होते. यातून त्यांना १२ लाखांचे उत्पन्न झाले असून त्या आज नर्मदापुरम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आयकॉन ठरल्या आहेत.
नवीन प्रयोग केला म्हणून यश मिळालं
कांचन वर्मा यांनी हळद शेतीत मिळालेल्या यशाबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, ” मला नवनवीन प्रयोग करण्याची सवय आहे. माझ्या पारंपारिक पिकांमधून समाधानकारक उत्पन्न मिळत होते, पण मला नवीन प्रयोग करायचा होता म्हणून मी हळद शेती करण्याचे ठरवले. आणि मी या प्रयोगात यशस्वी झाले. ”