Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अनेक वर्षांपासून कुटुंबियांची घरं आणि जनावरांचे शेड
मिळालेल्या माहितीनुसार, मौजा बेलोना सर्व्हे नं. २३० महाराष्ट्र शासनाने झुडपी जंगले म्हणून नियुक्त केली आहे. याठिकाणी जनावरे ठेवल्याची नोंद महसूल विभागाकडे आहे. नरखेड तालुक्यातील बेलोना ग्रामपंचायतीच्या या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून काही कुटुंबांनी अतिक्रमण करून घरे आणि जनावरांचे शेड बांधले आहे. सदर अतिक्रमण जागेवर ग्रामपंचायत कर लावून वसुली करते. ग्रामपंचायतीने या जागेवरील अतिक्रमण काढण्याची नोटीस त्यांना दिली होती. त्याअंतर्गत बुधवारी ग्रामपंचायत चमू पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जेसीबी आणि ट्रॅक्टरसह अतिक्रमण स्थळी पोहोचले. येथे बांबल यांच्या कुटुंबीयांनी अतिक्रमणाला विरोध केला.
नदीच्या खोलीकरणाचा प्रकार अरविंद बांबलने उघड केलेला
अरविंद बांबल यांनी ग्रामपंचायत मधील नदीच्या खोलीकरणाचा प्रकार उघडकीस केल्यामुळे ग्रामपंचायतने त्यांच्याच घरावरच अतिक्रमणाची कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ग्रामपंचायत अतिक्रमण विरोधी पथकाने गुरे, मेंढेरे राहत असलेला गोठा तोडण्यासाठी कारवाई सुरू केली. जेसीबीने कारवाई सुरू होताच अरविंद बांबल याने स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. आगीत अरविंद सापडल्याचे पाहून तेथे खळबळ पसरली. शेजारी उभ्या असलेल्या लोकांनी आग विझवण्याचे प्रयत्न तातडीने केले. मात्र आग आटोक्यात येईपर्यंत अरविंद गंभीररीत्या भाजला होता.
उपस्थितांनी त्यांना तातडीने जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला तातडीने नागपूरच्या मेयो रुग्णालयात हलवण्यात आले. येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णावर उपचार केले जात आहेत. दरम्यान, अरविंदने स्वत:ला पेटवून घेतल्याचे पाहून ग्रामपंचायतीचे अतिक्रमण विरोधी पथक तेथून निघून गेले. मात्र ही कारवाई नियमानुसारच असल्याचे ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी सांगतात.
या घटनेमुळे गावातील लोकांनी ग्रामपंचायतीवर तीव्र नाराजगी व्यक्त करत गावामधे कितीतरी वर्षांपासून रथ मिरवणुकीत रथाला प्रचंड प्रमाणत फिरण्यास त्रास होतो. त्यावेळी तिथे असलेले अतिक्रमण का नाही काढले जात? तसेच गावातील बाजार चौक, मंदिर परिसर, इंदिरा नगर तसेच संपूर्ण गावात अनेक अतिक्रमण आहे. त्याकडे अतिक्रमण विरोधी पथकाचे लक्षनाही आहे का ..? असा सवाल ग्रामस्थांकडून होत आहे.