Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Sarva Pitru Amavasya 2024 : धनप्राप्तीसाठी सर्वपित्री अमावस्येला करा हे उपाय, आर्थिक चणचणीपासून होईल सुटका
Sarva Pitri Amavasya 2024 Totke : हिंदू पंचांगानुसार पितृपक्षाचा शेवट हा सर्वपित्री अमावस्येने होतो. या दिवशी पितरांचे तर्पण, श्राद्ध तिथी आणि पिंडदान करण्याच्या विधीला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. या दिवशी केलेले कोणतेही उपाय प्रभावी ठरतात. पितृपक्षाचा पंधरवडा हा पितरांसाठी खास मानण्यात आला आहे. या काळात पितरांचे स्मरण करुन त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो. या दिवशी ज्या व्यक्तीची आपल्याला श्राद्ध तिथी माहित नसते त्यांचे पिंडदान, तर्पण विधी आणि श्राद्ध केले जाते. जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असतील तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी काही उपाय केल्याने फायदा होईल.
हिंदू पंचांगानुसार पितृपक्षाचा शेवट हा सर्वपित्री अमावस्येने होतो. या दिवशी पितरांचे तर्पण, श्राद्ध तिथी आणि पिंडदान करण्याच्या विधीला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. या दिवशी केलेले कोणतेही उपाय प्रभावी ठरतात.
पितृपक्षाचा पंधरवडा हा पितरांसाठी खास मानण्यात आला आहे. या काळात पितरांचे स्मरण करुन त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो. पितरांचा आशीर्वाद मिळाल्याने आपल्या जीवनातील अनेक संकटे दूर होतात. यंदा सर्वपित्री अमावस्या ही १ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी होणार असून २ ऑक्टोबर रात्री २ वाजून १९ मिनिटांपर्यंत असेल. या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असे म्हणतात.
अनेकदा आपण पैसे कमावून देखील आपल्याकडे ते टिकत नाही. किंवा वारंवार धनहानी होत असेल. तर आपल्यावर पित्र नाराज होतात असेल म्हटले जाते. सर्वपित्री अमावस्या ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते. या दिवशी ज्या व्यक्तीची आपल्याला श्राद्ध तिथी माहित नसते त्यांचे पिंडदान, तर्पण विधी आणि श्राद्ध केले जाते. जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असतील तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी काही उपाय केल्याने फायदा होईल.
इच्छा पूर्ण करण्यासाठी
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही तिळाचा लाडू बनवून तो मंदिरात अर्पण करायला हवा. तसेच हा लाडू कावळा, गाय आणि कुत्र्याला खाऊ घाला. तसेच हा लाडू अर्पण करताना तुमची इच्छा मनात ठेवा. असे केल्याने तुमच्या अनेक दिवसांपासून न पूर्ण होणाऱ्या इच्छा पूर्ण होतील. तसेच पितरांचा आशीर्वाद मिळेल.
ईशान्य दिशेला दिवा
वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही पवित्र मानण्यात आली आहे. हे देवतांचे स्थान मानले जाते. या काळात पितरांची पूजा करुन त्याचे स्मरण करावे आणि घरात सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी या दिशेला दिवा लावावा. असे केल्याने घरात सुख- समृद्धी नांदते. घरामध्ये पैसा येतो आणि आर्थिक स्थिती मजबूत होते.
आर्थिक चणचण कमी करण्यासाठी
सर्वपित्री अमावस्या ही पूर्वजांचे स्मरण आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी असते. या दिवशी पूजा आणि दान केल्याने आपल्याला फलप्राप्ती होते. या वेळी तुम्ही लक्ष्मी देवी समोर तुपाचा दिवा लावा आणि लक्ष्मी मंत्राचा १०८ वेळा जप करा. यामुळे आर्थिक संकटांतून मुक्ती होईल. सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी तुळशीच्या माळाचा २१ वेळा जप करावा.
