Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Importance of Gotra : ऍपलच्या सहसंस्थापिका लॉरेन पॉवेल यांना मिळालं नवं नाव, गोत्र ! हिंदू धर्मात गोत्राचे महत्त्व, जाणून घ्या
Laurene Powell Hindu Naam And Gotra : Apple कंपनीच्या सह-संस्थापिका लॉरेन पॉवेल यांची जोरदार चर्चा होते आहे. प्रयागराज येथे सुरु असणाऱ्या कुंभमेळ्यात लॉरेन सहभागी झाल्या होत्या. मकर संक्रांतीच्या दिवशी स्वामी कैलाशानंद गिरी यांनी विधीवत पूजा करून पॉवेल यांना दीक्षा दिली. स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल यांनी कमला हे हिंदू नाव धारण केलं असून त्यांना ‘अच्युत’ गोत्र देण्यात आले. लॉरेन यांना अच्युत गोत्र दिल्यानंतर लोकांमध्ये गोत्रावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. चला तर मग, जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये गोत्राचे धार्मिक महत्त्व काय आहे.
Apple कंपनीच्या सह-संस्थापिका लॉरेन पॉवेल प्रयागराज येथे सुरु असणाऱ्या कुंभमेळ्यात सहभागी झाल्या होत्या. मकर संक्रांतीच्या दिवशी स्वामी कैलाशानंद गिरी यांनी विधीवत पूजा करून पॉवेल यांना दीक्षा दिली. तसेच त्यांना गोत्र प्रदान करण्यात आले. लॉरेन पॉवेल यांना सनातन धर्मामध्ये रुची आहे. स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल यांनी दीक्षा घेतल्यानंतर कमला हे हिंदू नाव धारण केलं असून त्यांना ‘अच्युत’ गोत्र देण्यात आले. लॉरेन यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना शाही स्नान करता आले नाही, पण स्वामीजींनी त्यांच्यावर संगमाचे जल शिंपडून स्नानाचे पुण्य प्रदान केले आणि अमृत स्नानाचे महत्त्व सांगितले. दीक्षेनंतर लॉरेन यांना रुद्राक्षाची माळा धारण करण्याचा संकल्प देखील केला. दरम्यान लॉरेन यांना अच्युत गोत्र दिल्यानंतर सगळीकडे गोत्रावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. चला तर मग, जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये गोत्राचे धार्मिक महत्त्व काय आहे.
हिंदू धर्मात गोत्राची परंपरा आणि महत्त्व
पौराणिक मान्यतेनुसार गोत्राचा संबंध ऋषी परंपरेशी आहे. अनादीकाळापासून ऋषी-मुनींसोबत आपल्या सगळ्यांचे नाते जोडले जाते. प्राचीन काळापासून गोत्र व्यवस्था अस्तित्वात आहे. ही व्यवस्था चार ऋषींनी सुरू केली होती, त्याची नावे अंगिरा, कश्यप, वशिष्ठ आणि भृगु अशी आहेत. त्यानंतर जमदग्नि, अत्रि, विश्वामित्र आणि अगस्त्य यांचाही त्यात समावेश झाला. गोत्र म्हणजे एक प्रकारचे ओळखपत्र आहे, ज्यामुळे आपल्या कुटुंबाची वंशावळ ओळखली जाते.
एकाच गोत्रात विवाह का होऊ शकत नाही?
गोत्राचा अर्थ आहे समान पूर्वज असलेले लोक. हे लोक रक्ताच्या नात्याने जोडलेले असतात. हा नातेसंबंध वडिलांच्या वंशाने येतो, मात्र तो सातव्या पिढीपर्यंतच टिकतो. गोत्रामुळे कुटुंबाची वंशावळ ओळखता येते. अशा परिस्थितीत, समान गोत्रातील दोन लोकांचा विवाह होऊ शकत नाही, कारण त्यांच्यात रक्ताचे नाते असते. पौराणिक मान्यतेनुसार, जर एखाद्या पुरुषाने समान गोत्र असलेल्या महिलेशी विवाह केला, तर त्यांच्या संततीमध्ये शारीरिक किंवा मानसिक विकार होण्याची शक्यता असते. म्हणून, हिंदू धर्मात समान गोत्रामध्ये विवाह होत नाही.
गोत्राचा विज्ञानाशी संबंध
गोत्र म्हणजे एका अर्थाने रक्ताचे नाते. याच प्रकारे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर, एकाच रक्तगटातील लोकांच्या विवाहाने, जी मुले जन्माला येतात त्यांना आनुवांशिक आजार होण्याची शक्यता असते. विज्ञानानुसार, गोत्र परंपरेचा संबंध आपल्या जुनकांशी (जीन्सशी) आहे. एकाच गोत्रातील लोकांची शारीरिक रचना समान असते. त्यामुळे त्यांच्या संततीमध्ये आनुवांशिक आजार होण्याचा धोका वाढतो. वैज्ञानिक मानतात की, विविध गोत्रातील लोकांच्या विवाहामुळे जनुकांमध्ये (जीन्समध्ये) विविधता येते, ज्यामुळे मुलं अधिक निरोगी राहतात.
आधुनिकतेच्या नावावर गोत्रावर टीका
प्राचीन काळापासून गोत्र परंपरेला एक विशेष ओळख दिली गेली आहे. गोत्रावर आधारित, एखाद्याची वंशावळ आणि वंशाचे ठराविक ठिकाण समजायला मदत होते. याचा फायदा म्हणजे समान गोत्रात विविह होत नाहीत. समाजात आरोग्यदायी जीवनशैलीची निर्मिती करण्यात मदत मिळते. दरम्यान, आजच्या काळात अनेक लोक विशेषत: मनोरंजन क्षेत्रात या परंपरेवर अश्लील टिप्पणी केली जाते किंवा वादग्रस्त संवाद लिहिले जातात. आधुनिकतेच्या नावावर गोत्राला असमानता आणि भेदभाव यांच्यासोबत जोडले जाते, जे पूर्णपणे चुकीचे आहे. पुराणांमध्ये उल्लेख आहे की प्रत्येक माणूस कोणत्यातरी ऋषीचा वंशज आहे, म्हणूनच हिंदू धर्मात गोत्र परंपरेचा उद्देश प्रेम आणि आदर वाढविणे असाच आहे.
