लहान पक्षांना फोडतात, आम्हाला चांगलाच अनुभव, म्हणून आता नको महायुती, नको मविआ: राजू शेट्टी

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी या आघाड्यांच्या भांडणात शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी ओळखून शेतकरी च‌ळवळीतील संघटना आणि पक्षांनी एकत्रित ‘परिवर्तन आघाडी’ स्थापन केली आहे. ही आघाडी विधानसभा निवडणूक लढवणार असून येत्या २४ ऑगस्ट रोजी शेगाव (जि. बुलडाणा) येथे मेळावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आगामी विधानसभा निवडणुकीत ‘परिवर्तन आघाडी’ उमेदवार उभे करणार आहेत. सुभेदारी विश्रामगृहात मंगळवारी समविचारी पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर नियोजित मेळाव्याची माहिती देण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचे वामनराव चटप, ललित बहाळे, स्वतंत्र भारत पक्षाचे अनिल घनवट, भारत राष्ट्र समितीचे प्रदेशाध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे आणि दत्ता पवार यांची उपस्थिती होती.
Assembly Elections महायुती की मविआसोबत लढणार? बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जबाबदारी ढकलून चालणार नाही. त्यासाठी विधानसभा निवडणूक सामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढवावी अशी भूमिका आहे. या लढाईला दिशा देताना समविचारी पक्ष, संघटना यांना एकत्र आणून ‘परिवर्तन आघाडी’ स्थापन केली आहे. राज्यात सक्षम पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्वच्छ आणि आश्वासक चेहरे घेऊन २८८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. आमची कोणत्याही आघाडीशी हातमिळवणी नाही. कारण लहान पक्षांना सोबत घेऊन त्यांचेच लोक फोडण्याचे काम आघाड्या करतात. महादेव जानकर, विनायक मेटे, बच्चू कडू आणि मला याचा वाईट अनुभव आला आहे’, असे शेट्टी म्हणाले.
लोकसभेला चांगली साथ दिलीत, विधानसभेतही जोमाने काम करा, अल्पसंख्याक कार्यकर्त्यांना नाना पटोलेंचा ‘बुस्टर डोस’

परिवर्तन आघाडीत कुणीही येऊ शकते. रविकांत तुपकर यांचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी मतभेद असले तरी आघाडीशी असण्याचे कारण नाही. परिवर्तनाची लाट आली तर प्रस्थापित आघाड्या पराभूत होतात ते लोकसभा निवडणुकीत सर्वांनी पाहिले. महाराष्ट्रात ६६ लाख तरुण बेरोजगार आहेत. कर्जाच्या ओझ्याने राज्य दबलेले असून आम्ही सर्वसामान्यांच्या बाजूने लढणार आहोत, असे चटप म्हणाले. जातीय व धार्मिक ध्रुवीकरणावर निवडणूक लढवणार नसल्याचे आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे यांच्याशी चर्चा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी अंतरवाली येथे मनोज जरांगे यांची भेट घेतली. जरांगे दोन्ही आघाड्यांवर नाराज आहेत. त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, ते आमच्यासोबत आल्यास आनंद आहे. २०११ मध्ये मी संसदेत असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा मांडला होता, असे शेट्टी म्हणाले. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही आघाडीबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

Source link

Maharashtra Vidhan Sabha ELection 2024Raju ShettiRaju Shetti on Parivartan aaghadiVidhan Sabha Election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूकराजू शेट्टी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकविधानसभा निवडणूक
Comments (0)
Add Comment