लेट पण थेट? भाजपच्या अध्यक्ष पदासाठी फडणवीसांच्या नावाची चर्चा; ‘त्या’ भेटीनंतर नाव आघाडीवर

मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचं अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची चर्चा सुरु झाली आहे. विद्यमान पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यामुळे आता त्यांचा उत्तराधिकारी कोण होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी नुकतीच दिल्लीत जाऊन मोदींची सपत्नीक भेट घेतली. त्यामुळे भाजपची धुरा देवेंद्र फडणवीसांकडे सोपवली जाणार का, अशी चर्चा सुरु झाली .

लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालेलं नाही. मिशन ४५ हाती घेणाऱ्या महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या. भाजपच्या जागा २३ वरुन ९ वर आल्या. याची जबाबदारी घेत फडणवीसांनी राजीनामा देऊ केला होता. पण तो पक्ष नेतृत्त्वानं स्वीकारलेला नाही. त्यांच्याच नेतृत्त्वात भाजप विधानसभेची निवडणूक लढणार आहे. राज्यातलं सरकार चालवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. तीन पक्षांमध्ये समन्वय राखण्याचं काम फडणवीस करतात.
CM Eknath Shinde: विधानसभेसाठी CM शिंदेंचं खास मिशन, भाजपचं वाढलं टेन्शन; मोर्चेबांधणी सुरु, घमासान होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांशी देवेंद्र फडणवीसांचे चांगले संबंध आहेत. नागपूरचे असलेले फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सलोख्याचे संबंध राखून आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत. नड्डा यांचा कार्यकाळ संपलेला आहे. त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नड्डा यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून लवकरच मोकळं करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

भाजपचं नेतृत्त्व फडणवीसांना पक्षात महत्त्वाचं स्थान देण्याच्या प्रयत्नात असल्याचं त्यांच्या दिल्ली दौऱ्यातून आणि मोदींच्या भेटीतून दिसून आल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. याआधी अध्यक्षपदासाठी काही नावांची चर्चा झाली. पण काही नावांना भाजप नेतृत्त्वाचा आक्षेप होता. तर काही नावं संघाला मान्य नव्हती. त्यामुळेच अध्यक्ष निवडण्यास उशीर झाला. फडणवीसांच्या नावाला पक्ष आणि संघाची मान्यता आहे. त्यामुळेच मोदी आणि फडणवीस यांची भेट महत्त्वाची ठरते.
Sharad Pawar: शरद पवारांसोबत पार्टनरशिप करुन देतो, २ कंपन्या सुरु करु! पोलीस कॉन्स्टेबलला ९३ लाखांचा गंडा
महाराष्ट्रातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री असलेले फडणवीस नागपूरमधून निवडून येतात. नागपूरचेच नितीन गडकरी याआधी भाजपचे अध्यक्ष राहिले आहेत. फडणवीसांकडे अध्यक्षपद गेल्यास पक्षाला बरेच फायदे होऊ शकतात. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. मनोज जरांगे पाटील सातत्यानं फडणवीसांना लक्ष्य करत आहेत. त्याचाच फटका भाजपसह महायुतीला लोकसभेला बसला. आता फडणवीस दिल्लीत गेल्यास, पक्षाध्यक्ष झाल्यास मराठा आरक्षणाचा मुद्दा भाजपला अधिक उत्तम प्रकारे हाताळता येईल. पक्ष नव्या नेतृत्त्वासह विधानसभेला सामोरा जाईल.

देवेंद्र फडणवीसांचे नेतृत्त्वाशी उत्तम संबंध आहेत. त्यामुळे ते अध्यक्ष होत असल्यास विरोध होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. याआधी विनोद तावडेंचं नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत होतं. पण आता फडणवीसांचं नाव शर्यतीत पुढे आलं आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये फडणवीसांनी देशातील अनेक राज्यांमध्ये प्रचार केला. हिंदी भाषेवर त्यांचं उत्तम प्रभुत्व आहे. या बाबी फडणवीसांसाठी जमेच्या ठरतात.

Source link

amit shahDevendra Fadnavisjp naddaMaharashtra politicsNarendra Modiअमित शहादेवेंद्र फडणवीसभाजप अध्यक्षमहायुतीमहाराष्ट्र राजकीय बातम्या
Comments (0)
Add Comment