लोकसभेला आपण मोदींना घाम फोडला, आता विधानसभेला प्रचाराला याच! उद्धव ठाकरेंचे मोदींना चॅलेंज

मुंबई : शिवसेना ही गंजलेली तलवार नाही तर तळपती तलवार आहे. लोकसभेला आपण असे लढलो की पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही घाम फुटला. आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला महाराष्ट्रात याच, असे खुले आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. भारतीय जनता पक्ष म्हणजे चोर कंपनी आहे. मला तर मोदींचे भाषण ऐकतानाही मला कीव येते. विधानसभा निवडणूक हे आपल्यासाठी शेवटचं आव्हान आहे, नंतर आव्हान द्यायला कुणी उरणार नाही, असे उद्धव म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शाखाप्रमुखांसोबत महत्त्वाची बैठक वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात संपन्न झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी शाखाप्रमुखांना केलेल्या संबोधनात भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उघड इशारे देऊन आगामी काळातील आपले आक्रमक इरादे स्पष्ट केले.
माझ्या कुटुंबावर चालून आलात, एक तर तू राहशील नाहीतर मी राहिन, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना इशारा

एक तर तू राहशील नाहीतर मी राहिन

अनेक मोठे नेते आपल्याला मातोश्रीवर येऊन भेटून गेले. उद्धवजी आपण देशाला नवी दिशा दाखवलीत, अशा शब्दात आपल्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले. त्यांनी मी सांगितले जोपर्यंत आपण सरळ होतो, तोपर्यंत ठीक पण आपल्या कुणी वाकड्यात गेले की आपण सोडत नाही. आदित्य आणि मला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कोणकोणते डाव रचले हे अनिल देशमुख यांनी सांगितले. म्हणजे हे लोक माझ्या घरावर चालून आले. परंतु तरीही मी सगळे सहन करून हिमतीने उभा राहिलोय, असे सांगतानाच एक तर तू राहशील नाहीतर मी राहिन, असा उघड इशाराच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.
मराठा आरक्षण प्रश्नाचं कसं? उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी म्हणतील तसं! त्यांना आमचा पाठिंबा!

शिवसेना ही गंजलेली नाही तर तळपती तलवार

शिवसेना ही गंजलेली तलवार नाही, तर तळपती तलवार आहे. मुंबई टिकवण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा होता, आपण तो वेळोवेळी दिला. आपल्या हक्काच्या मुंबईत आपल्याला या चोरांच्या राज्यात असे वागवले जात आहे. हे सगळे दोन व्यापारी करत आहेत. त्यांची वृत्ती आपल्याला मुळासकट उपटून टाकायची आहे. मुंबईला नखं लावल्यास बोटे छाटून टाकू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

विधानसभा निवडणूक आपल्यासाठी शेवटचे आव्हान

विधानसभा निवडणूक आपल्यासाठी शेवटचे आव्हान आहे, नंतर आव्हान द्यायला कुणी उरणार नाही. पण यावेळेला जर आपण गाफिल राहिलो तर हे उपरे आपल्या छाताडावर बसतील, त्यामुळे मशाल घरोघरी पोहोचवा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच आपले सरकार आल्यावर धारावीचे टेंडर रद्द करू, असेही त्यांनी जाहीर केले.

Source link

Maharashtra Vidhan SabhaMaharashtra Vidhan Sabha CampaignPM ModiUddhav ThackerayUddhav Thackeray Challenge PM Modiउद्धव ठाकरेउद्धव ठाकरे भाषण शाखाप्रमुख मेळावानरेंद्र मोदीमहाराष्ट्र विधानसभा २०२४
Comments (0)
Add Comment