निलेश पाटील, जळगाव : जळगावात धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या कुटुंबांत तिचे पती कामावर गेले, तर मुलं शाळेत शाळेत गेली होती. त्याचवेळी तिने टोकाचं पाऊल उचल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. संध्याकाळी मुलं शाळेतून घरी आली. ते दारात उभं राहुल दरवाजा ठोठावत होते. मात्र आतून आवाज येत नव्हता. दरवाजा उघडण्यासाठी मुलं आईला बाहेरुन जोरजोरात आवाज देत होते. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने, दरवाजा न उघडल्याने काही वेळात पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसांनी दरवाजा उघडताच समोरचं दृष्य पाहून मुलांनी एकच आक्रोश केला.
पती कामावर आणि मुलं शाळेत गेल्यानंतर घरात एकट्याच असताना राणी शामकांत देशमुख, वय ४४, राहणार ओम साई नगर, या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवेढ्यात संध्याकाळी समोर आली. मुली शाळेतून घरी आल्यानंतर ही प्रकार समोर आला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कानडदा रोडवरील ओम साई नगरात देशमुख कुटुंब राहतं. राणी देशमुख या पती आणि दोन मुलांसह राहत होत्या. पती शामकांत देशमुख हे औद्योगिक वसाहत परिसरातील एका कंपनीत कामाला आहेत. मंगळवारी ३० जुलै रोजी दोन्ही मुलं शाळेत गेली होती. तसंच पती कामावर गेले होते. त्यावेळी घरात कोणीही नव्हतं. त्याचवेळी घरात कोणी नसताना विवाहितेने घरात गळफास घेतला. संध्याकाळी दोन्ही मुलं घरी आली, त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. मुलांनी त्यांच्या घराच्या वर राहणाऱ्या एका मावशीला दरवाजा बंद असल्याचे सांगितलं.
पती कामावर आणि मुलं शाळेत गेल्यानंतर घरात एकट्याच असताना राणी शामकांत देशमुख, वय ४४, राहणार ओम साई नगर, या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवेढ्यात संध्याकाळी समोर आली. मुली शाळेतून घरी आल्यानंतर ही प्रकार समोर आला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कानडदा रोडवरील ओम साई नगरात देशमुख कुटुंब राहतं. राणी देशमुख या पती आणि दोन मुलांसह राहत होत्या. पती शामकांत देशमुख हे औद्योगिक वसाहत परिसरातील एका कंपनीत कामाला आहेत. मंगळवारी ३० जुलै रोजी दोन्ही मुलं शाळेत गेली होती. तसंच पती कामावर गेले होते. त्यावेळी घरात कोणीही नव्हतं. त्याचवेळी घरात कोणी नसताना विवाहितेने घरात गळफास घेतला. संध्याकाळी दोन्ही मुलं घरी आली, त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. मुलांनी त्यांच्या घराच्या वर राहणाऱ्या एका मावशीला दरवाजा बंद असल्याचे सांगितलं.
बराच वेळ दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह पोलीस स्वीट कॉन्स्टेबल अनिल फेगडे, अनिल मोरे, रामकृष्ण इंगळे हे घटनास्थळी पोहोचले. दरवाजा उघडल्यानंतर महिला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तात्काळ विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.