युतीची विकासकामांची ग्वाही, आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई! निवडणुकीआधीच उडला धुरळा

नवी मुंबई, शिल्पा नरवडे : विधानसभा निवडणूक जवळ आलेली असतानाच नवी मुंबईत भाजपमधील अंतर्गत कलह आणि शिंदे गट- भाजपमधील वाद उफाळून आल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. “पाच शासकीय कामे दाखवा एक लाख मिळवा बेलापूरची आमदार मी आहे त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी मलाच मिळणार आहे. विकास कामांचे श्रेय मला मिळू नये म्हणून गणेश नाईकांनी सीबीडी उड्डाणपूल, मरिना प्रकल्प आणि शासकीय रुग्णालयाचे काम लटकवून ठेवले आहे. सत्तेत असताना प्रकल्पग्रस्तांसाठी यांना काहीच करता आले नाही. नवी मुंबईतील घरांचा प्रश्नही यांच्यामुळे रखडला,” अशी तोफ भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी भाजपचे ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार गणेश नाईक यांच्यावर आज बोलताना डागली आहे.

श्रेयवादाच्या लढाईत विकासकामे रखडली!

भाजप आमदार गणेश नाईक यांनी झोपडपट्टीच्या सर्व्हेक्षणाला विरोध केल्यामुळे ऐरोलीमध्ये शिंदे गटाचे विजय चौगुले यांनी नाईकांच्या विरोधात उपोषण सुरू केले असतानाच आज मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन नाईक यांच्या कार्यपध्दतीवर जोरदार टीका केली आहे. सीबीडी बेलापूर येथील खाडीमध्ये मरिना प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. प्रकल्पाची वर्कऑर्डर निघून सहा वर्षे उलटून गेले तरी अद्याप काम सुरू झालेले नाही, काम गणेश नाईक यांच्याच एका ठेकेदाराने घेतले आहे, त्यामुळे त्याच्याकडून काम करण्यास विलंब केला जात आहे असे मंदा म्हात्रे म्हणाल्या. इतक्यावर न थांबता गणेश नाईक यांच्यामुळे रखडलेल्या कामांचा मंदा म्हात्रेंनी भर पत्रकार परिषदेच पाढाच वाचला.
Shiv Sena vs BJP : आमदार भाजपचा, दावा शिंदेसेनेचा; माजी केंद्रीय मंत्र्यांच्या पराभवानंतर शिवसेनेचा कॉन्फिडन्स वाढला

बेलापूरमधून सायन-पनवेल मार्गावर जाण्यासाठी कोकण भवन समोरील रस्त्यावरून जावे लागते. हाच रस्ता महामार्गाला जोडलेला असल्याने याच रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. ती टाळण्यासाठी सीबीडी सेक्टर ११ मधून एक उड्डाणपूल तयार करण्याचा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता.याच उड्डाणपूलामुळे पामबिचवरून येणार्‍या वाहनांनाही कोकण भवन समोरील रस्ता टाळून महामार्गावर जाता येणार होते. पण नाईक यांनी हा प्रकल्प फक्त श्रेय मिळत नसल्यामुळे लटकवला. या प्रकल्पाची फाईल गायब करण्यासाठी अधिकार्‍यांवर दबाव आणला. शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय होऊ नये यासाठी नाईकांनी जिवाचा मोठा आटापिटा केला, असेही आरोप यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
Vidhan Sabha Election : ‘त्या’ जागांवरुन युतीत रस्सीखेच, निवडणुकांआधीच पेच, नेत्यांची डोकेदुखी वाढली

पाच काम दाखवा एक लाख मिळवा..

पाच शासकीय कामे दाखवा एक लाख मिळवा बेलापूरची आमदार आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी मलाच मिळणार आहे. तसे पक्षश्रेष्टींनी जाहीरही केले आहे. तरीही भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक या मतदारसंघात घुसखोरी करीत आहे. गणेश नाईक आणि संदीप नाईक इतकी वर्षे सत्तेत होते. तरी त्यांना नवी मुंबईचा अपेक्षीत विकास करता आला नाही. नाईक कुटूंबांची कोणतीही पाच शासकीय कामे दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा, असे आव्हानही मंदा म्हात्रे यांनी यावेळी पत्रकारांसोबत बोलताना दिले आहे.

प्रचाराचा नारळ फुकट जाणार..

संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा नारळ फोडला असला तरी तो फुकट जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत यांनी फक्त नारळच फोडला नव्हता तर प्रचारही सुरू केला होता. मात्र प्रत्यक्षात काहीच मिळाले नाही. यावेळी बेलापूरमधून उमेदवारीची नाईकांनी कितीही आटापिटा केला तरी उमेदवारी मलाच मिळणार आहे, असा विश्वास मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला.

Source link

mahayuti disputemla ganesh naikmla manda mhatrenavi mumbaiगणेश नाईकनवी मुंबईभाजपमंदा म्हात्रेमहायुती
Comments (0)
Add Comment