ठाणे : ठाण्यातील डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरातील एका रिक्षा स्टँडवर नंबर लावण्यावरून दोघा रिक्षाचालकांमध्ये वाद झाला. या वादातून एका रिक्षाचालकाने दुसऱ्या रिक्षाचालकावर लोखंडी रॉडने हल्ला केला. हा हल्ला जोरात असल्यामुळे रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खंबाळपाड्याच्या कमानीजवळ रिक्षा स्टँड आहे. या स्टँडवरून ठाकुर्ली, डोंबिवली, कल्याणसह अन्य परिसरात रिक्षा चालतात. त्यामुळे या स्टँडवर प्रवाशांसह रिक्षाचालकांची नेहमीच वर्दळ असते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास या स्टैंड वर अघटित घटना घडली. रिक्षाचा नंबर लावण्यावरून दोन रिक्षाचालकांमध्ये वाद झाला. सुनील राठोड याने रिक्षात लपवलेला लोखंडी रॉड काढून अविनाश कांबळे याच्यावर हल्ला केला. लोखंडी रॉडच्या साह्याने अविनाशच्या डोक्यात रॉड घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेचे वृत्त कळताच टिळक नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर अविनाश कांबळे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलकडे पाठवून दिला. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून हल्लेखोर खुनी सुनील राठोड याला ताब्यात घेतले. या संदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत.
या घटनेचे वृत्त कळताच टिळक नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर अविनाश कांबळे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलकडे पाठवून दिला. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून हल्लेखोर खुनी सुनील राठोड याला ताब्यात घेतले. या संदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली. येथे एक चौदा वर्षाचा मुलगा चार दिवस घरात आपल्या आईच्या मृतदेहाजवळ बसून असल्याचं समोर आलं. जेव्हा या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडला. त्यावेळी त्या मुलाची आई मृतावस्थेत आढळून आली तर तो तिच्या मृतदेहाशेजारी बसलेला होता. दरम्यान, याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. हा मुलगा स्पेशल चाइल्ड असल्याने त्याला तेवढी समज नाही म्हणून तो चार दिवस आईच्या मृतदेहाजवळ बसून राहिल्याचं सांगितलं जात आहे.