ठाकरे काय म्हणाले!
माझ्या पायाशी कोणीतरी टरबूज ठेवलंय काही जणांना वाटतं मी त्यांना आव्हान दिले. पण मी कोणत्याही ढेकणांना आव्हान देत नाही, ढेकनांना आव्हान द्यायचं नसतं, तर त्यांना अंगठ्याने चिरडायचे असते. मी म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्र आणि तू म्हणजे दरोडेखोर, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली याच विधानावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले.
पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे. अत्यंत फस्ट्रॅटेड आहे, आणि त्या फस्ट्रेशन मध्ये ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे. एखादा व्यक्ती अशाप्रकारचा फस्ट्रेशनमध्ये डोकं बिघडल्या सारखे बोलतात, त्यामुळे त्यांना जास्त उत्तर द्यायचं नसते. “उद्धव ठाकरे यांनी असे भाषण करून अमित शहा यांचे विधान सत्य करुन दाखवले. अमित शहा म्हणाले होते, औरंगजेब फॅन क्लबचे उद्धव ठाकरे हे सदस्य आहेत, आणि तेच आज ठाकरेंनी सिद्ध केले आहे.” शनिवारी भाजपाच्या कार्यकरणी बैठकीच्या कार्यक्रमाला उपस्थित होण्यासाठी फडणवीस शहरातील सुरेश भट सभागृहात पोहोचले होते. याठिकाणी पत्रकारांशी बोलताना फडणवीसांनी ठाकरेंच्या विधानावर भाष्य केले होते. यासोबतच उपमुख्यमंत्र्यांनीही सचिन वाझे यांच्या दाव्यावर सुद्धा गृहमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा देशमुखांवरील आरोप आणि दाव्यांबाबतही फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केले. फडणवीस म्हणाले, “मी केवळ प्रसारमाध्यमांद्वारेच हे पाहिले आहे. सध्या तरी मला त्यांच्याकडून कोणतेही पत्र आलेले नाही. मी मागील दोन दिवसांपासून नागपुरात उपस्थित असल्याने काही आले आहे की नाही, याबद्दल मला माहीत नाही, असे काही झाले तर मी बघेन.. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.