म.टा. प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणा जवळ असलेल्या पीर बाबाचे दर्शन घेऊन आले. त्यानंतर पाण्यात खेळण्यासाठी उतरलेल्या ३ बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल शनिवारी सायंकाळी पावणेपाच वाजता घडली. दोन जण पाण्यात उतरले नसल्याने ते बचावले.पारोळा शहरातील बडा मोहल्ला परिसरात राहत असलेले पाच किशोरवयीन मुले पारोळा शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या भोकरबारी धरणाच्या किनारी असलेल्या पीर बाबाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर यातील हसन रजा न्याय मोहम्मद न्याज (वय १६), इजाज रजा न्याज मोहम्मद (वय१४, रा. बडा मोहल्ला पारोळा), आवेश रजा शेख मोहम्मद (वय १७ रा. मालेगाव जि. नाशिक) येथील धरणातील पाण्यात खेळण्यासाठी उतरले. विशेष म्हणजे यातील कोणालाही पोहता येत नव्हते. धरणात उतरलेल्या तीन तरुणांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे एकापाठोपाठ एक ते पाण्यात घसरून बुडाले.
त्या पाच किशोरवयीन मुलांपैकी पाण्याच्या बाहेर उभा असलेला आश्रम पीर मोहम्मद (वय ९), इब्राहिम शेख अमीर (वय १४) यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण ते त्यांना वाचवू शकले नाहीत. दोघांनी लगेच वंजारी गावाकडे मदतीसाठी धाव घेतली. घडलेल्या घटनेची आपभीती सांगितल्यानंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र उशीर झाल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. यावेळी डॉक्टर प्रशांत रनाडे, डॉक्टर सुनील पारोचे, डॉक्टर गिरीश जोशी, मंगला त्रिवेणी दीपक पाटील, प्रमोद सूर्यवंशी प्रेम वानखडे यांनी त्यांची तपासणी केली.
त्या पाच किशोरवयीन मुलांपैकी पाण्याच्या बाहेर उभा असलेला आश्रम पीर मोहम्मद (वय ९), इब्राहिम शेख अमीर (वय १४) यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण ते त्यांना वाचवू शकले नाहीत. दोघांनी लगेच वंजारी गावाकडे मदतीसाठी धाव घेतली. घडलेल्या घटनेची आपभीती सांगितल्यानंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र उशीर झाल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. यावेळी डॉक्टर प्रशांत रनाडे, डॉक्टर सुनील पारोचे, डॉक्टर गिरीश जोशी, मंगला त्रिवेणी दीपक पाटील, प्रमोद सूर्यवंशी प्रेम वानखडे यांनी त्यांची तपासणी केली.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमळनेर विकास देवरे, तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे, पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे बाळू गीते, भोकरबारी पोलीस पाटील ज्योती ज्ञानेश्वर बिरारी, शहर तलाठी निशिकांत माने, पोलीस हिरालाल पाटील यांनी धाव घेतली होती.
पोटच्या पोराचं टोकाचं पाऊल
दरम्यान, वाघाच्या कातडीची तस्करी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या वडिलांना भेटून दिल्याने अल्पवयीन मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हलखेडा तालुका मुक्ताईनगर येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता घडली. सोम रहीम पवार (वय १४) असं या आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. आत्महत्यापूर्वी त्याने चार ओळींची सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे. त्यावरही तसाच उल्लेख केला आहे.