Jitendra Awhad : सहा डिसेंबरला राज ठाकरे लोणावळ्याला जातात, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अशातच राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. शरद पवार यांना जातीयवादी म्हणत महाराष्ट्राचा मणिपूर होवू नये याची काळजी शरद पवारांनी घ्यावी असा टोला राज ठाकरेंनी शरद पवार यांना लगावला . यावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. सहा डिंसेबरला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी राज ठाकरे दादरमधील निवास सोडून लोणावळ्याला जातात असा दावाच आव्हाडांनी करुन एकच खळबळ उडवून दिली आहे.

नेमके प्रकरण काय

राज ठाकरे आजपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूरात असताना राज ठाकरे यांनी शरद पवारांना जातीयवादी असे म्हणत त्यांचावर टीका केली. यानंतर शरद पवार गटाचे प्रवक्ते यांनी थेट राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राज ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. आव्हाड म्हणाले, राज ठाकरे यांनी जातीपातीच्या राजकरणात बोलू नये. त्यांची भूमिका नेहमीच मुस्लिम समाजाविरोधात असते तसेच परप्रांतीय विरोधात असते. दलिताच्या विरोधात असते त्यामुळे त्यांन जातीपातीबद्दल बोलूच नये असे आव्हाड म्हणाले.
Manoj Jarange : अशा लोकांना भाव नका देवू; राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर जरांगेंचा मराठ्यांना सल्ला

राज ठाकरे यांना चर्चेत राहायचे असेल तर शरद पवारांचे नाव घ्यावे लागते म्हणून राज ठाकरे शरद पवारांचे नाव घेवून त्यांचावर आरोप करतात असे आव्हाड म्हणाले. राज ठाकरे यांनी कितीवेळा भूमिका बदलली आहे त्यांनी त्यांचा विचार करावा. राजकरणात त्यांचे अस्तित्व संपले आहे. एसी घरात असलेल्या जन्मलेल्या मुलाला आरक्षण काय कळणार आरक्षणाचे महत्त्व काय कळणार? असे म्हणत आव्हाडांनी राज ठाकरे यांना डिवचले.
Vidhan Sabha Election : ‘झोपलेला पक्ष’ म्हणत आदित्य ठाकरे कडाडले! काकाच्या दौऱ्यावर पुतण्याची विखारी टीका

पुढे बोलताना आव्हाड म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी राज ठाकरे दादरचा बंगला सोडून लोणावळ्याला जावून राहतात हे कोणाला माहिती नाही, पण आता तेच सांगावे लागेल सगळ्यांना असे आव्हाडांनी विधान केले तर दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगेंनी सुद्धा ठाकरेंवर तोफ डागली आहे.

मनोज जरांगे म्हणाले, राजकरण्यांना गोरगरीब मराठ्यांचे काही पडलेले नाही. अशा लोकांना भाव नका देवू, यांच्या तोंडापुढं देखील उभे राहू नका. सर्व राजकरणी पैशावर झोपणारे लोक आहेत यांना भावना आणि आरक्षण काय आहे ते कळत नाही. राजकरणी गोरगरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेतअशी टीका जरांगे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

Source link

dadar chaityabhoomijitendra awhad on raj thackerayraj thackeray on babasaheb ambedkarजितेंद्र आव्हाडबाबासाहेब आंबेडकरमनसेमहापरिनिर्वाण दिनराज ठाकरे
Comments (0)
Add Comment