परमबीर सिंग अन् देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘डील’ झाली होती; अनिल देशमुखांचा खळबळजनक दावा

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर आरोप करण्यासाठी तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्याशी एक ‘डील’ केले होते, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्याने फडणवीस-देशमुख वादात नवी भर पडली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील गाडीत बॉम्ब ठेवणाऱ्या गाडीमालकाची हत्या झाली. त्या घटनेचे मास्टर माइंड परमबीर सिंग होते. त्यांना अटक होणार होती. त्यामुळे ते फडणवीस यांना शरण गेले. त्यातून माझ्यावर आरोप लावण्याचे डील दोघांमध्ये झाल्याचा आरोप, देशमुख यांनी सोमवार प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. चांदीवाल आयोगाचा अहवाल हा महाविकास आघाडी सरकार असताना आला होता असे फडणवीस यांनी सांगितले. त्याचदरम्यान आमचे सरकार पाडण्यात आले. प्रत्येकाला ५० ‘खोके’ देऊन भाजपने सरकार पाडले. त्यामुळे हा अहवाल आमच्या सरकारला सादर करता आला नाही, असेही देशमुख म्हणाले. हा अहवाल दोन वर्षांपासून गृह खात्याकडे पडून आहे. देवेंद्र फडणवीस या खात्याचे प्रमुख आहे. दरम्यान या अहवालात मला क्लिन चिट देण्याच्या बातम्या आल्याने तो जाहीर केला जात नसल्याची शंका देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.

-तर फडणवीसांनी नार्को टेस्टला होकार द्यावा

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर मी परमबीर सिंग यांची भेट घेऊन त्यांची माफी मागितली असल्याचा दावा सिंग यांनी केला. नार्को चाचणी मागणी केली असेल तर मी त्याला तयार आहे. मात्र, असे करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नार्को चाचणीला सामोरे जावे असे आव्हान जिल्हा परिषद सदस्य आणि अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी दिले. प्रसारमाध्यमांशी बोलताना या प्रकरणात उपमुख्यमंत्री फडणवीस अडचणीत आले असल्याने आता त्यांनी परमबीर सिंग आणि वाझे यांना पुढे केले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
अनिल देशमुखांविरोधात भाजपची होर्डिंगबाजी; ‘वसूली बुद्धी’ म्हणून हिणवलं, नागपुरात गुन्हा दाखल
‘झूठ बोले कौआ काटे’

नागपूर : तत्कालिन मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात डील झाले होते, या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आरोपावर झुठ बोले कौआ काटे’ अशा चारच शब्दांत फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. गजानननगर परिसरातील नागरिकांना पट्टे वाटप करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात फडणवीस सहभागी झाले होते. त्यापूर्वी पत्रकारांशी चोलताना त्यांनी पट्टेवाटप कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले. ‘वंचित’चे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी बांधवांना केलेल्या आवाहनाबाबत फडणवीसांना विचारले असता, ‘ मी त्यांचे विधान ऐकले नाही, त्यावर बोलणे उचित नाही’ असे ते म्हणाले. अनिल देशमुखांच्या आरोपाला त्यांनी उत्तर देणे टाळले. झूठ बोले कौआ काटे’ या लोकप्रिय गाण्याची एक ओळ तेवडी ऐकवली. देशमुख खोटे बोलत आहेत हेच त्यांनी सुचविले.

Source link

anil deshmukhdeshmukh vs fadnavisDevendra FadnavisMaharashtra politicsMumbai Policeparam bir singhनागपूर बातम्याभाजपमुकेश अंबानी
Comments (0)
Add Comment