उद्धव ठाकरेंच्या सभेदरम्यान राडा, मनसेच्या नेत्याची आक्रमक प्रतिक्रिया, सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. बीडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गाडी अडवून त्यांच्यावर सुपारी फेकल्यानंतर दोन ठाकरेंमधील वाद आता उफाळून आला आहे. या वादानंतर लगेचच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ”सुरुवात तुम्ही केली, आता शेवट आम्ही करणार” असा सज्जड इशारा दिला. होता त्याचाच प्रत्यय ठाण्यात ककाल शनिवारी आला. बीड येथील सुपारी हल्ल्यानंतर त्याचे पडसाद आता थेट ठाण्यात उमटले आहेत. मनसेने उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शेण, नारळ आणि बांगड्या फेकल्या. अधिक बातमी वाचा सविस्तर…
२. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मेळावा होता. यासाठी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते ठाण्यात पोहोचले. तेव्हा मनसेकडून त्यांच्या उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्या. या घटनेने ठाण्यात मोठा तणाव निर्माण झाला.

३. गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी एक्सवरून केली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नाशिक आणि जळगाव येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून या प्रकल्पामुळे या नदी खोऱ्यातून १०.६४ टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे. अधिक बातमी वाचा सविस्तर…

४. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन बंधुमधील वाद नेहमीच चव्हाट्यावर असतो. आता ऐन विधानसभेच्या तोंडावर पुन्हा ठाकरे बंधूमधील वाद उफाळला आहे. राज ठाकरे यांच्या मराठवाडातील दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरे गटाने राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकत सुपारी आंदोलन केले. हेच आंदोलन मनसेला जिव्हारी लागल्याने मनसेने सुद्धा थेट उद्धव ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले आहे.

५. सन २००३ च्या सिंहस्थासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळाला नसताना, आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी विशिष्ट विकसकांची ५३.५० कोटींची भूसंपादन प्रकरणे मंजूर केल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या आक्षेपानंतरही विकसकांना धनादेश देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी महापालिकेत ठिय्या दिल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा अडवण्याचा निर्णय घेतला आहे.

६. मराठवाड्याला उत्तर महाराष्ट्राशी रेल्वे कनेक्शन जोडण्यासाठी अजिंठा रेल्वे कनेक्टिव्ही योजनेंतर्गत जालना-जळगाव या नवीन १७४ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे सध्या मराठवाड्यातून उत्तर महाराष्ट्रमार्गे दिल्लीला जाण्यासाठी मनमाडमार्गे ३३६ किलोमीटर अंतराचा वळसा मारावा लागत होता. हे अंतर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर १७४ किलोमीटरवर येईल.

७. महाराष्ट्रासह सहा राज्यांतील विस्तारलेल्या पश्चिम घाटाचे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन) निश्चितीच्या सहाव्या अधिसूचनेत नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील २०२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. संवेदनशील क्षेत्रांच्या यादीत समाविष्ट केलेल्या गावांमध्ये नवीन खाणकाम, उत्खनन आणि वाळू उपसा या प्रकल्पांवर बंदी राहणार आहे.

८. शहरात सारसबागेपासून आज (रविवारी) सकाळी मराठा आरक्षण शांतता रॅली निघणार असल्याने रॅली मार्गावरील वाहतुकीमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. रॅली गेल्यानंतर मार्ग पूर्ववत सुरू केले जाणार आहेत.

९. स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने कुस्तीपटू विनेश फोगटने क्रीडा लवादाच्या न्यायालयाकडे (सीएएस) केलेले अपील यशस्वी होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. हा निर्णय आपल्या बाजूने नसला तरी त्याने देशासाठी काय केले हे लोकांनी विसरू नये, असे नीरज म्हणाला. विनेशला बुधवारी पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त वजन असल्याने अपात्र ठरवण्यात आले. अधिक बातमी वाचा सविस्तर…

१०. रवीना टंडन आणि करिश्मा कपूर या दोघीही ९० च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. या दोघी आपल्या सिनेमात असव्यात म्हणून निर्माते दिग्दर्शक नेहमीच आतुर असायचे. पण त्याकाळी रवीना टंडन आणि करिश्मा यांच्यात भांडण झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या. ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रवीना आणि करिश्मा एकमेकांशी बोलयच्या नाहीत.

Source link

maharashtra mumbai newsMaharashtra Political Newstodays top newstop 10 headlinesआजच्या ठळक बातम्याटॉप १० हेडलाईन्समहाराष्ट्र मुंबई बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्या
Comments (0)
Add Comment