कोल्हापूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावर ठाणे येथे शनिवारी रात्री नारळ, बांगड्या आणि टोमॅटो फेकण्यात आल्याची घटना घडली. यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले असून याचे पडसाद आता राज्यभर उमटायला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरात संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मनसेच्या शाखा फलकांची तोडफोड केली. यामुळे आता ऐन विधानसभेच्या तोंडावर पुन्हा ठाकरे बंधूमधील वाद उफाळला असून यामुळे पुन्हा शिवसैनिक आणि मनसैनिक आमने सामने आले आहेत.
बीडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गाडी अडवून त्यांच्यावर सुपारी फेकल्यानंतर दोन ठाकरेंमधील वाद आता उफाळून आला आहे. बीडचे पडसाद आता थेट ठाण्यात उमटले असून मनसेने उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शेण, नारळ आणि बांगड्या फेकल्या. यानंतर याचे पडसाद आता राज्यभर उमटायला सुरू झाले असून कोल्हापुरात संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी रात्री उशिरा कोल्हापूर शहरातील मनसेच्या शाखा फलकांची तोडफोड केली.
त्यामुळे संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात शिवसैनिकांनी ताराबाई पार्क येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा फलकाची तोडफोड केली. आज सकाळी या तोडफोडेचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले असून यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
बीडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गाडी अडवून त्यांच्यावर सुपारी फेकल्यानंतर दोन ठाकरेंमधील वाद आता उफाळून आला आहे. बीडचे पडसाद आता थेट ठाण्यात उमटले असून मनसेने उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शेण, नारळ आणि बांगड्या फेकल्या. यानंतर याचे पडसाद आता राज्यभर उमटायला सुरू झाले असून कोल्हापुरात संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी रात्री उशिरा कोल्हापूर शहरातील मनसेच्या शाखा फलकांची तोडफोड केली.
त्यामुळे संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात शिवसैनिकांनी ताराबाई पार्क येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा फलकाची तोडफोड केली. आज सकाळी या तोडफोडेचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले असून यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
अमोल मिटकरींच्या गाडीचीही तोडफोड
एका काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष मोर्चे बांधणीला सुरुवात केले आहेत. यातच महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मुख्य चेहरे असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंमधील वाद महाराष्ट्रला काही नवा नाही. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर सुपारी बाज म्हणत आरोप केला होता. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली होती. यानंतर आता पुन्हा ठाकरे गटाकडून ही सुपारीबाज म्हणत आरोप केल्यानंतर हा वाद पुन्हा पेटला आहे.