समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार, आमचं सरकार आल्यावर कारवाई करणार; नाना पटोलेंचा इशारा

अर्जुन राठोड, नांदेड : राज्यातील समृद्धी महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन अनेकजण समृद्ध झाले आहेत, आमचं सरकार आल्यानंतर आम्ही श्वेतपत्रिका काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे. नांदेडमध्ये आयोजित काँग्रेसच्या विभागीय बैठकीत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार, बाळासाहेब थोरात, लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

नाना पुढे म्हणाले की, शक्तीपीठ महामार्गाला काँग्रेसचा विरोध आहे. समृद्धी महामार्गामुळे लोकांचे नुकसान झाले आहे. अनेक जणांच्या महामार्गालगत जमिनी घेतल्या आणि सरकारच्या पैशांची लूट केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. शेतकरी आत्महत्या वरून पटोले यांनी सरकारवर टिका केली. मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवारी जिंकून आणायचं आहे, तेव्हा कामाला लागण्याच्या सूचना नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना केल्या.
Ratnagiri News : मिलिंद नार्वेकर अदृश्य हातामुळे निवडून आले, माझ्यासाठी एक असाच अदृश्य हात हवा; उदय सामंत यांचा मिश्किल अंदाज

२४ फेब्रुवारीला नांदेडला स्वातंत्र्य मिळाले

काँग्रेसच्या विभागीय बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टिका केली. २४ फेब्रुवारीला अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडून भाजपात गेले होते. देशाला १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळाले आहे, पण नांदेडला विशेष करून मराठवाड्याला खरं स्वातंत्र्य २४ फेब्रुवारीला नांदेडला स्वातंत्र्य मिळाल्याचे नाना पटोले म्हणाले. मागच्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात काँग्रेसची एकही जागा नव्हती पण, आता तीन ही जागा निवडून आल्या म्हणजे शंभर टक्के परफॉर्मन्स आहे असं देखील पटोले म्हणाले.
Solapur News : भाजपचे अनेक नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट; काँग्रेस नेत्याचा भाजप आमदारांवर हल्लाबोल
भाजपाला दुसऱ्यांची घर फोडण्याची मानसिकता आहे. उद्धव ठाकरे यांच घर फोडलं, शरद पवार यांचं देखील घर फोडलं आणि काँग्रेसचं देखील घर फोडण्याचं त्यांनी प्रयत्न केला, असं म्हणत नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये इनकमिंग वाढली आहे. भाजपचे अनेक नेते काँग्रेसमध्ये येणार आहे.

मराठा बांधव भेटण्यासाठी आले होते

काँग्रेसच्या विभागीय बैठकीत मराठा बांधवानी गोंधळ घातला. बैठक सुरू असताना मराठा बांधव स्टेजवर पोहचले, त्यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. पण मराठा बांधवानी गोंधळ घातला नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. आरक्षणासंदर्भात मराठा बांधव हे मला भेटण्यासाठी आले होते, त्यांनी मला आरक्षणाबाबत निवेदन देखील दिल्याचं पटोले यावेळी म्हणाले.

Source link

corruption in samruddhi mahamarg work nana patoleNana PatoleNandednanded vidhan sabhaनाना पटोले नांदेड भाषणसमृद्धी महामार्गसमृद्धी महामार्ग आरोप नाना पटोलेसमृद्धी महामार्ग भ्रष्टाचार नाना पटोलेंचा आरोप
Comments (0)
Add Comment