फडणवीस-एकनाथ शिंदेंची राजकीय कुंडली, दादा म्हणाले-CM पदासाठी नशीब लागते!

मुंबई : आठ वेळा निवडून आल्यानंतरही आणि पाचवेळा उपमुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतरही अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाने नेहमीच हुलकावणी दिली आहे. गत आठवड्यातच त्यांनी मुख्यमंत्रिपदाविषयीची खंत बोलून दाखवली होती. एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत देखील अजित पवार यांनी हीच सल बोलून दाखवली. उद्धव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण विधिमंडळाचे सदस्य नसतानाही त्यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली असे सांगत मुख्यमंत्रिपदाला नशीब लागते, असे अजित पवार म्हणाले.

राज्य विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना लोकसभेतील अपयश विसरून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली.
Baramati News: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित दादांचा निर्णय, ५० वर्षात पहिल्यांदाच बारामतीत निरीक्षकाची नेमणूक

मुख्यमंत्रिपदासाठी नशीब लागते

अजित पवार म्हणाले, “१९९९ साली आमदार झालेले देवेंद्र फडणवीस आणि २००४ आमदार झालेले एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी बसले. मी १९९१ साली राजकारणात आलो, खासदारपदी निवडून आलो, त्यानंतर राज्याच्या विधिमंडळात प्रवेश केला. शिंदे फडणवीस ज्युनिअर आहेत, असे मजेशीर वक्तव्य मी एका कार्यक्रमात केले. राजकारणविरहित कार्यक्रम होता. माझ्या भाषणाची निराळी शैली आहे. त्याक्षणी मला सुचलेले ते विचार होते. हास्यविनोदाने मी तो किस्सा सांगितला. निवडणूक न जिंकताही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आमदार नसतानाही पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्रिपदासाठी नशीब लागते, हे देखील खरे आहे.
Jay Pawar : बारामती विधानसभेला जय पवार रिंगणात? अजितदादा म्हणाले सात-आठ वेळा लढलो, आता इंटरेस्ट नाही

सुप्रिया सुळे यांच्यासमोर सुनेत्राला उमेदवारी देणे ही चूक होती, दादांची पुन्हा कबुली

सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय चुकीचाच होता, अशी कबुली आजही अजितदादांनी दिली. मनात येईल ते बोलण्याचा माझा स्वभाव आहे. लोकसभा निवडणुकीत जे झाले त्याचा कुणाला दोष देणार नाही. सुप्रिया सुळे यांच्यासमोर सुनेत्राला उमेदवारी देणे ही चूक होती. असे करायला नका होते, हे मला वाटते. कौटुंबिक सलोखा जपायचा असतो, त्यामुळे घरात राजकारण आणणे ठीक नाही, असे अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar Confession : सुप्रियांविरुद्ध सुनेत्रांना उभं करायला नको होतं, अजित दादांची खंत, माझं मन मला सांगतंय…

सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणे हा निर्णय कुणाचा होता?

सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणे हा निर्णय कुणाचा होता? असे विचारल्यावर ते म्हणाले, पार्लटमेंटरी बोर्डाने सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली. पक्षातील सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी मिळून उमेदवारीचा निर्णय घेतला.

पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाणार?

तुम्ही कबुली दिल्यानंतर पक्षाचे केडर अस्वस्थ होणार नाही का? आपण शरद पवारांकडे पुन्हा जाल, असे कार्यकर्त्यांना वाटणार नाही का? या प्रश्नावर ते म्हणाले, कौटुंबिक मुद्द्यावरून मी माझे मत मांडले, पक्षातले कार्यकर्ते मला ओळखतात. माझे वक्तव्य मनापासून होते, त्यांनी वाईट वाटून घेऊ नका.

Source link

ajit pawarAjit Pawar ANI Interviewdevendra fadanvisEknath ShindeNCP Jan Sanman yatraअजित पवारअजित पवार एएनआय मुलाखतएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस
Comments (0)
Add Comment