मला मुख्यमंत्री बनायचं असं उध्दव ठाकरे यांनी कधीच सांगितलेलं नाही, मात्र…; पाहा संजय राऊत पुढे काय म्हणाले

नागपूर (जितेंद्र खापरे) : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची कामगिरी चांगली होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. राऊत यांच्या म्हणण्यानुसार विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवली जाईल, तसेच पक्षाने निवडणुकीची तयारी सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडीत मतभेद नसल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला. तसेच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे कधीच सांगितले नाही.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे अनेक प्रमुख नेते विदर्भात आले आहे. सर्व जिल्ह्यात पक्षाचे नेते जाऊन आले आणि आढावा घेतला. विदर्भातल्या सर्वच जागा संदर्भात आम्ही आढावा घेतला आहे. या वेळेला नागपूर शहरांमध्ये शिवसेना विधानसभेची एक जागा लढवणार आहे. तसेच रामटेक विधानसभेची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लढवणार आहे. त्या दृष्टीने शिवसेनेचे कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा होईल. निवडणुका जवळ आली आहे आणि महाराष्ट्राच्या उपराजधानी मध्ये शिवसेनेचे अनेक दिवसांपासून काम चालू आहे.
Maharashtra Election Opinion Poll: महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्यास कोणाची सत्ता येणार? ओपिनियन पोलने दिले धक्कादायक उत्तर, कोणाला किती जागा मिळणार जाणून घ्या

महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेने रामटेक लोकसभाची जागा काँग्रेसला दिली. त्यामुळे विधानसभेत महाविकास आघाडी म्हणून नागपूर शहर आणि ग्रामीण मध्ये एक एक जागा आम्ही लढवू. यावेळी विदर्भामध्ये महाविकास आघाडीला उत्तम यश मिळाले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला वर्धात जागा मिळाली यवतमाळ वाशिम ची जागा शिवसेनेला आली. तसेच विदर्भात काँग्रेसलाही लोकसभेत उत्तम यश मिळाले आहे. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीचे यश पाहता महाविकास आघाडी विदर्भात चांगला स्कोर करेल या शंका नाही.
हा त्रास मी सहन करू शकत नाही; मनोज जरांगेंनी राज्य सरकारसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला इशारा

देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेत विरोधक खोड करत असल्याची टीका केली होती. त्यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, कोणीही खोड टाकत नाही. हे सगळं स्वप्न आहे त्यांना स्वच्छ आणि स्पष्ट दिसत नाही. आणि ऐकू येत नाही. कोणत्याही चांगल्या योजनेपासून महाराष्ट्राच्या जनतेला, महिलांना, बेरोजगारांना फायदा होईल अशी योजना ही कोणाच्याही खाजगी मालकीची नसते, ती सरकारची असते. त्याच्यामध्ये खोडा टाकण्याचे काम आम्ही करणार नाही. ते नरेंद्र मोदी करतात, त्यांनी केले आहे . काँग्रेसच्या योजना त्यांनी स्वतःच्या नावाने खपवल्या आणि काँग्रेसला शिव्या घातल्या. महाराष्ट्र मध्ये ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक योजना निर्माण केल्या पण या सरकारने त्या योजना बंद करण्याच्या प्रयत्न केला आहे.

राहुल गांधी यांच्या यांनी खटाखट पैसे देऊ असे म्हटले होते त्यावर फडणवीस म्हणाले आम्ही फटाफट पैसे दिले. यावर संजय राऊत म्हणाले, फडणवीस यांच्या नागपूरच्या घरामध्ये टांकसाळ लावली आहे. ते पैसे छापतात खटाखट. हे सरकारी पैसे आहे. आमचे सरकार आलं असतं तर राहुल गांधी म्हणाले तसे खटाखट, टकाटक ,पटापट सर्व झालं असतं. आणि हे महाराष्ट्रात लवकरच होईल असेही संजय राऊत म्हणाले.

Source link

chief minister of maharashtramaharashtra assembly electionmaharashtra assembly election 2024Sanjay Raut on Chief Ministerउद्धव ठाकरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकमहाविकास आघाडीशिवसेना उद्धव ठाकरे गटसंजय राऊत
Comments (0)
Add Comment