पंचांसमक्षच भावावर विळ्याने सपासप वार, शेतीच्या वादातून निर्घृण खून, परिसर हादरला

अर्जुन राठोड, नांदेड : दोन भावांमधील शेतीचा वाद मिटवण्यासाठी गावकऱ्यांनी बैठक बोलावली होती. मात्र बैठकीत तोडगा निघता वाद विकोपाला गेला आणि भावाने गावकऱ्यांच्या समक्ष चुलत भावावर विळ्याने सपासप वार करून खून केला. गावकऱ्यांकडून अनेक वेळा दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता. परंतु ते हा कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने खूनाची घटना घडली आहे.

जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील रुई गावात ही धक्कादायक घटना घडली. परवेज पंटूश देशमुख वय २१ वर्ष असं मयत तरुणाचं नाव आहे. येथील रहिवासी मृतक परवेज देशमुख आणि त्याचा चुलत भाऊ साहिल देशमुख यांच्यात शेतीवरून वाद सुरु होता. यावरुन नेहमी त्यांचे खटके उडायचे. गावातील पोलीस पाटील आणि गावकरऱ्यांकडून अनेकवेळा दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न देखील केला होता, पण काहीच साध्य झाले नाही. यामुळे रविवारी गावकऱ्यांनी पोलीस पाटील परसराम भोयर यांच्या घरी बैठक बोलावली. बैठकीत परवेज देशमुख, साजराबी देशमुख, पप्पू मीरसाहेब देशमुख, साहिल बबलू देशमुख, सोहेब बबलु देशमुख, फिरोजा देशमुख, शेख इंरशाद तसेच सरपंचाचे पती गणेश राऊत, पोलीस पाटील परसराम भोयर, तंटामुक्ती अध्यक्ष उत्तमराव सुकळकर हे हजर होते. बैठकीदरम्यान शेतीसंबंधी चर्चा करण्यात आली.
Nashik News: झेंडावदनासाठी गेलेल्या चिमुकल्यासोबत धक्कादायक घटना, मृतदेह आढळला, घटनेने खळबळ
आमची जमीन कोठे आहे अशी साहील बबलू देशमुख याने विचारणा केली. त्यावेळी तुमची जमीन तुमचे वडील बबलू देशमुख यांनी पुर्वीच विकली आहे, असे सांगण्यात आले. शेती विकल्याने साहिल बबलू देशमुख यांना राग अनावर झाला. बैठक आटोपताच सर्वजण घरी जाण्याकरिता उठले. यापुढे जमिनीवरुव भांडण करू नका, असं पोलीस पाटील आणि गावकऱ्यांनी सांगितले. तेवढ्यातच साहील यांनी परवेज देशमुखला पाठीमागून हेरले आणि परवेजच्या शरीरावर विळ्याने सपासप वार केले. या हल्लानंतर परवेज हा रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, घटनेनंतर एकच खळबळ उडाली.
Kolkata Murder: कोलकाता प्रकरणी सर्वोच्च दखल; माजी प्राचार्यांची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी, सत्य समोर येणार?
केवळ अडीच एकर शेतीवरून भावाने भावचा निर्घृणपणे खून केल्याने माहूर तालुका हादरला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मयताचे वडील पंटुस देशमुख यांच्या फिर्यादीवरून माहूर पोलीस ठाण्यात साहील बबलू देशमुख, सोहेब बबलू देशमुख या दोघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे हे करीत आहेत.

Source link

crime newsfarm disputemahur man killed brothermurder casenanded newsखून प्रकरणगुन्हेगारी बातम्याचुलत भावाचा खूननांदेड ब्रेकिंग बातम्यामाहुर मधील खुनाची घटना
Comments (0)
Add Comment