आरोपींवर फास्ट ट्रॅक कोर्टात कठोर कायदे करून कारवाई झाली पाहिजे, उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

बदलापूर : बदलापुरमधील शाळेत चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. संतप्त नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवर उतरुन रेलरोको केला. या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला वाटतं की आपण आपल्या लाडक्या बहिणींसाठी (लाडली बहन) योजना राबवतोच पण त्याचबरोबर त्यांच्या मुलींच्या सुरक्षेकडेही लक्ष दिलं पाहिजे. आपण फक्त काही राज्यांनाच टार्गेट करून चालणार नाही तर देशाच्या प्रत्येक भागात आपल्या मुलींचे रक्षण केले पाहिजे आणि आरोपींवर त्वरित फास्ट ट्रॅक कोर्टात कठोर कायदे करून कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.

‘देशाच्या अनेक भागांत अशा दुर्दैवी घटना वारंवार घडत आहेत. मात्र, काही राज्यात अशा घटना घडल्या, तर त्याचा राजकारणासाठी वापर केला जातो, असा नवा ट्रेंड सुरू झाला असल्याचंही ते म्हणाले. दिल्लीत काही वर्षांपूर्वी निर्भया प्रकरण घडले होते. त्या आरोपीला फासावर लटकवायला इतका वेळ लागला. अशा प्रकरणांमध्ये न्याय प्रक्रियेला विलंब करणाऱ्यांना जबाबदार धरायला हवे. हातरस, उन्नाव, राजस्थान किंवा आता बदलापूरमध्येही प्रत्येक आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि आमच्या मुलींना संरक्षण मिळाले पाहिजे.’
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं मोठं पाऊल
उद्धव ठाकरेंनी विधेयकाबाबत बोलताना सांगितलं, की आम्ही आमच्या कार्यकाळात शक्ती विधेयक आणणार होतो. विधेयकाचा मसुदा तयार होता. त्यावेळी विधानसभेचे अधिवेशन कोरोनामुळे दोन ते तीन दिवसांचे झाले होते. आमचे सरकार गद्दारांनी पाडले म्हणून आम्ही हे विधेयक आणू शकलो नाही. आता त्यांनी हे विधेयक रखडवले आहे. हे विधेयक मांडून या आरोपींना या शक्ती विधेयकाची खरी शक्ती दाखवून देण्याची जबाबदारी त्यांची आहे.
Badlapur News: बदलापुरात आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलक संतप्त, नागरिकांकडून शाळेची तोडफोड
बदलापूरची शाळा भाजपच्या कोणत्या तरी कार्यकर्त्यांची असल्याचे मला समजले. मात्र, यात राजकारण आणण्याचा माझा हेतू नाही. कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना कायद्याच्या कक्षेत आणलेच पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले.
Moradabad News : डॉक्टरकडून नर्सवर लैंगिक अत्याचार, खासगी रुग्णालयातील घटनेने हादरलं शहर

त्याशिवाय वरळीतील हिट अँड रन आरोपी मिहीर शाह देखील आता स्कॉट मुक्त आहे. त्यांनी त्याला निबंध लिहायला सांगितला असावा. त्याचप्रमाणे ते या आरोपीलाही निबंध लिहून सोडायला सांगणार आहेत का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. कठोर कारवाई व्हायला हवी आणि न्याय प्रलंबित प्रक्रियेत अशी प्रकरणे गायब होणे परवडणारे नाही. तेव्हाच आपण म्हणू शकतो की आपल्या लाडक्या बहीण आणि मुलींबद्दल आपल्याला आदर आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

Source link

Uddhav Thackerayuddhav thackeray on badlapur caseउद्धव ठाकरेउद्धव ठाकरे प्रतिक्रिया बदलापूर अत्याचारबदलापूर बलात्कार उद्धव ठाकरे प्रतिक्रिया
Comments (0)
Add Comment