मुसळधार पावसामुळे झोपडपट्टी पाण्याखाली गेल्यामुळे शासनाकडून 8 ते 10 दिवसांमध्ये नुकसान भरपाई मिळेल

तेज POLICE टाइम्स : परवेज शेख

दिनांक २२/८/२४ रोजी आजाद समाज पार्टी च्या वतीने नुकत्याच जुलै महिन्यवत मुसळधार पावसामुळे मुळा मुठा नदी लगत असणार्या तमाम झोपडपट्टी पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गोर गरीब नागरिकांची जनजीवन विस्कळीत झाले होते तरी सदर पूरग्रस्त नागरिकांना महाराष्ट्र शासनाकडून अद्याप मदत मिळालेली नाहि त्यामुळे निवासी उपजिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले व सदर पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी असे पक्ष्याच्या वतीने बोलण्यात आले या वेळी निवासी उपजिल्हा अधिकारी यांनी असे आश्वासन दिले की येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये नुकसान भरपाई मिळेल असे आश्वासन दिले या वेळी आजाद समाज पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र कार्यधक्ष भिमराव कांबके,पुणे जिल्हा महिला अध्यक्षा स्वाती ताई गायकवाड, पुणे शहर महिला अध्यक्षा अर्चनाताई केदारी , सविताताई गायकवाड, लताताई अडसूळ,मंगलताई गायकवाड,सुजाता कांबळे ,लताताई लोखंडे,चेतालीताई थोरात, अशरफ खान, निखिल पवार,रमेश धनगर ,रूपेश सातपुते व अनेक कार्यकर्ते व महिला उपस्थित होते

Comments (0)
Add Comment