ठाकरेंकडून महाराष्ट्र बंदची घोषणा, पवारांनी कोर्टाच्या निर्णयानंतर बंद मागे घेण्याचं आवाहन केलं

Sharad Pawar On Maharashtra Bandh : बदलापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाविरोधात महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी बंद मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई : बदलापूरमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर शाळेतच सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर बदलापुरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोल केलं होतं. केवळ बदलापूर नाही तर संपूर्ण राज्यभरातून या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. चिमुकलीवरील अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट रोजी, शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र हा बंद बेकायदेशीर असल्याचं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने, कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं होतं. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.

शरद पवार यांनी २४ ऑगस्ट रोजी होणारा राज्यव्यापी बंद मागे घ्यावा असं म्हटलं असून संविधानाचा आदर राखत हे आवाहन करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
Badlapur Case Update: पोलीस-शाळा प्रशासनाची बंद दाराआड चर्चा; चिमुकलीच्या पालकांचा गंभीर आरोप; या एका व्यक्तीमुळे दाखल झाली तक्रार

शरद पवार यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?

‘बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता.

हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते.’

Maharashtra Bandh : ठाकरेंकडून महाराष्ट्र बंदची घोषणा, पवारांनी कोर्टाच्या निर्णयानंतर बंद मागे घेण्याचं आवाहन केलं

दरम्यान, दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराविरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. ठिकठिकाणी आंदोलनं, मोर्चे काढत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. महाविकास आघाडीने दिलेली बंदची हाक ही महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचार विरोधात सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होता. मात्र आता उच्च न्यायालयाच्या निकालानंतर हा बंद मागे घेण्याचं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

24 august maharashtra bandhmaharashtra bandhsharad pawar on maharashtra bandhUddhav Thackerayउद्धव ठाकरे महाराष्ट्र बंदबदलापूर चिमुकलीवर अत्याचारमहाराष्ट्र बंदशरद पवार बंद मागे घेण्याचं आवाहन२४ ऑगस्ट महाराष्ट्र बंद
Comments (0)
Add Comment