हा माणूस आज हवा होता! रांझ्याच्या पाटलाचा हात पाय कापून चौरंग केला, तसा… राज ठाकरेंची गर्जना

Raj Thackeray Yavatmal Tour :रांझ्याच्या पाटलाचा हात-पाय कापून चौरंग केला होता, तसे यांचे चौरंग केले पाहिजेत, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
राज ठाकरे
यवतमाळ : लहान मुली-महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींचा रांझ्याच्या पाटलाचा हात-पाय कापून जसा चौरंग केला होता, तसे यांचे चौरंग केले पाहिजेत, अशी गर्जना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. मनसेच्या राजू उंबरकर यांना यवतमाळमधील वणी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी जाहीर केली. विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी यवतमाळमध्ये भाषण करत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

राज ठाकरे काय म्हणाले?

नुकताच बदलापूरमध्ये लहान मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली, तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी ती गोष्ट बाहेर काढली, तेव्हा लोकांना कळली. तोपर्यंत दाबून ठेवली होती. ती घटना घडल्यावर सगळीकडे हे सुरु झालं.. काल कोल्हापूरमध्ये घडलं.. लहान लहान मुलींवर बलात्कार करत आहेत. (छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे बोट दाखवत) हा माणूस आज पाहिजे होता, ही महाशक्ती आज पाहिजे होती, रांझ्याच्या पाटलाचा हात-पाय कापून चौरंग केला होता, तसे यांचे चौरंग केले पाहिजेत, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

Raj Thackeray on Badlapur : हा माणूस आज हवा होता! रांझ्याच्या पाटलाचा हात पाय कापून चौरंग केला, तसा… राज ठाकरेंची गर्जना

Uddhav Thackeray on Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंदची वेळ काय? काय सुरु काय बंद? उद्धव ठाकरेंकडून तुमच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं
आपण आपल्या मुली शाळेत पाठवायच्या. काल मी गोंदियात आश्रम शाळेत गेलो होतो, तिथे लहान लहान मुली होत्या.. कोणावर कायद्याचा वचक राहिलेला नाही, याचा दोष मी पोलीस यंत्रणेला अजिबात देणार नाही. कारण त्यांच्यावर जो सरकारी दबाव असतो, त्यामुळे यांना तसं वागावं लागतं. कारण यांनी काही करायला घेतलं की त्यांचं निलंबन करणार, त्यांना नोकरीवरुन काढून टाकणार, चौकशा लावणार आणि जे सरकारमध्ये बसलेत, त्यांच्या चौकशा कधी लावत नाहीत. कुठे लाठीचार्ज करायला लावणार, परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांच्याकडे काही नाही. असं थोडी चालतं? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
MNS on Maharashtra Bandh : …तर मविआच्या महाराष्ट्र बंदला आमचाही १०० टक्के पाठिंबा, मनसेचा ‘सशर्त’ निर्णय
तुम्हाला वाटतं मी सहज बोलतोय, पण अत्यंत गांभीर्याने सांगतोय, एकदा राज ठाकरेच्या हातात महाराष्ट्राची सत्ता द्या, राज्य कसं हाताळलं जातं, कायद्याची भीती काय असते, ते मी दाखवून देईन. परत कुठल्या बाईकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही. याच पोलीस यंत्रणेला सांगणार, ४८ तास देणार, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ४८ तास दिले ना, साफ करुन ठेवतील महाराष्ट्र अख्खा, सगळ्या गोष्टी यांना माहिती असतात, पण कोण घेणार अंगावर? सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत, मी जाहीर केलेल्या ब्ल्यू प्रिंटमध्ये आहेत, असंही राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी मनसेच्या राजू उंबरकर यांना यवतमाळमधील वणी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

badlapur news todaybadlapur school caseछत्रपती शिवाजी महाराजबदलापूर मुली लैंगिक अत्याचाररांझा गाव पाटील चौरंगाराज ठाकरे बदलापूर अत्याचारराज ठाकरे यवतमाळ भाषणराज ठाकरे विदर्भ दौरा
Comments (0)
Add Comment