Uddhav Thackeray: बहिणीवर अत्याचार होत आहेत आणि हे निर्लज्ज राख्या बांधत फिरत आहेत; उद्धव ठाकरेंची सरकावर जोरदार टीका

Crimes Against Women: राज्यात महिलांवर अत्याचार होत असताना हे लोक राख्या बांधत फिरत आहेत. राज्यात असे निर्लज्ज सरकार कधी पाहिले नव्हते अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई

आमचा महाराष्ट्र संस्कारक्षम महाराष्ट्र आहे. मात्र राज्यात सध्यां विकृत सरकार असून नराधमांवर पांघरुण घातले जात आहे. बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित राहणार आहे. यासाठी स्वाक्षरी मोहिम घेऊन लोकभावना व्यक्त करणाऱ्या या सह्या सर्वोच्च न्यायालयाला आम्ही पाठवणार आहोत. आमचा बंद नाकारुन तुम्ही आमचा आवाज बंद करु शकत नाही, असा इशाराच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राज्य सरकारला दिला. तर त्याचवेळी शक्ती कायदा धुळ खात पडला आहे, त्यावरील धुळ झटका आणि तो अंमलात आणा, असे आवाहनही त्यांनी राष्ट्रपतींना यावेळी केले.

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनाजवळ काळ्या फिती लावून निदर्शेने करण्यात आली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठाकरे शैलीत राज्य सरकारवर निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, दररोज अनेक ठिकाणी काही ना काही घडतं आहे. कधी मुंबईत घडतंय तर कधी बदलापूर , सोलापूर आणि सांगलीत घडतंय. कंस मामा भाचीला न्याय कधी देतोय? कंस मामा केवळ सर्वत्र राख्या बांधत फिरत आहेत. बहिणीवर अत्याचार होत आहेत आणि हे निर्लज्ज राख्या बांधत फिरत आहेत. त्यांना आडकाठी होऊ नये म्हणून आमच्या आंदोलनात आडकाठी करत आहात. एवढे निर्लज्ज सरकार महाराष्ट्राने कधी पाहिलं नव्हते, अशा शब्दात ठाकरे यांनी सरकावर जोरदार टीका केली.

ते पुढे म्हणाले की, आम्ही बदलापूर प्रकरणातील नराधमाच्या विरोधात महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र नराधमांची बाजू घेणाऱ्या काही लोकांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली. कोर्टाने आमच्या महाराष्ट्र बंदबाबत विरोध केला. पक्षाबाबत निर्णय देताना तातडीने दिला जात नाही. मात्र आमच्या बंदबाबत लगेच निर्णय देण्यात आला, अशी न्याय व्यवस्थेबाबतची नाराजीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.ठाकरे पुढे म्हणाले की, राज्यामध्ये निर्लज्ज सरकार असून हे सगळे कंस मामा आहेत. आम्हाला लाडकी नको तर सुरक्षित बहीण हवी आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. सरकारने त्यांचे चेले चपाटे कोर्टात पाठविले आणि बंद पाळण्यास अडथळा आणला. घटनाबाह्य सरकार नराधमांना पाठिशी घालत आहे. आम्ही महिलांच्या सुरक्षिततेसाठी बंद पुकारला होता. सरकारमध्ये संकटाचा सामना करण्याची हिंमत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगाविला.

Uddhav Thackeray: बहिणीवर अत्याचार होत आहेत आणि हे निर्लज्ज राख्या बांधत फिरत आहेत; उद्धव ठाकरेंची सरकावर जोरदार टीका

काँग्रेसकडून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीमान्याची मागणी

मुंबईसह महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित होता पण मागील दोन अडीच वर्षात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. महिला अत्याचारात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारीमध्ये ५७ टक्के वाढ झाली आहे. ४-६ वर्षांच्या लहान मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहेत. मुली व महिलांवरील वाढत्या अत्याचाराची नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी राजीनामा देण्याची मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी शनिवारी आंदोलनादरम्यान केली.

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

crimes against womenuddhav thackeray latest newsUddhav Thackeray newsउद्धव ठाकरेउद्धव ठाकरेंची सरकावर जोरदार टीकाबदलापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलनमहाविकास आघाडीचे मूक आंदोलन
Comments (0)
Add Comment