बदलापुरच्या शाळेतील कॅमेरा बंदचा उलगडा, तर पश्चिम रेल्वेवर ३५ दिवसांचा ब्लॉक

१. बदलापूर येथे घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. पण त्यावर राजकारण केल्या जात आहे हे जास्त दुर्दैवी आहे. विरोधकांना त्या माध्यमातून राज्यात दंगली घडवायच्या होत्या, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात तुमचे कारस्थान आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज, रविवारी ‘लखपती दीदीं’चा मेळावा होणार आहे. जळगाव विमानतळ परिसरातील २२ एकर क्षेत्रात यासाठी भव्य वॉटरफ्रुफ मंडप उभारण्यात आला आहे. भर पावसात प्रशासनाची मेळाव्याच्या तयारीसाठी कसरत सुरू आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण विमानतळ परिसरावर केंद्रीय यंत्रणांची करडी नजर राहणार आहे.

३. नेपाळ येथे पशुपतिनाथांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या बसला अपघात होऊन त्यात २७ जणांना मृत्यू झाला. यातील मृत भाविक भुसावळ तालुक्यातील वरणगावसह परिसरातल्या गावातील आहेत. अपघातात अनेक कुटुंबांतील कर्ते पुरुष, महिला तर काही घरातील दाम्पत्यांची प्राणज्योत मालवल्याने या घरांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण वरणगाव पंचक्रोशी शोकसागरात बुडाल्याने कुणीच कुणाशी न बोलता पाणवलेल्या डोळ्यांनी एकमेकांचे सांत्वन करीत आहेत.

४. पुणे आणि परिसराची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रो, अवजड वाहनांना ठराविक काळासाठी बंदी अशा विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी वर्तुळाकार मार्ग (रिंग रोड) विकसित झाल्यासच कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे. महाविकास आघाडी आणि आता महायुतीच्या काळातही रिंग रोडचे केवळ स्वप्न दाखवले जात असून, त्याचे प्रत्यक्ष काम कधी केव्हा सुरू होणार, याची प्रतीक्षा कोंडीत फसलेल्या सर्व वाहनचालकांना आहे. बातमी वाचा सविस्तर…

५. पश्चिम रेल्वेवर लोकलने प्रवास करणाऱ्यांना येत्या शनिवारपासून पुढील महिनाभर प्रवासाचे विशेष नियोजन करावे लागणार आहे. गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गासाठी ३१ ऑगस्टपासून ३५ दिवस ब्लॉकचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले असून, यातील पाच दिवस १० तासांचा पॉवर ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत ९६० लोकल फेऱ्यांवर परिणाम होणार असून, मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांची वाहतूकही विलंबाने होणार आहे. बातमी वाचा सविस्तर…

६. बदलापूरमधील अत्याचार घडलेल्या शाळेत घटनेच्या दिवशी सीसीटीव्ही बंद असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी चौकशी केली असता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मेंटेनन्सचे काम ज्या ठेकेदाराला देण्यात आले होते. त्याची मुदत महिन्याभरापूर्वीच संपली होती. त्यामुळे जबाबदारी आता शाळा प्रशासनावरच आली आहे. सीसीटीव्हीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली होती. मात्र या ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर त्याला किंवा इतर ठेकेदाराला ते काम देण्यात आले नव्हते. महिन्याभरापासून सीसीटीव्हीच्या मेंटेनन्सचे काम बंद राहिल्यामुळे काही कॅमेरे बंद पडले होते. बाचमी वाचा सविस्तर…

७. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये शनिवारी संततधार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून पावसाच्या लहान-मोठ्या सरी बरसत होत्या. दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने नोकरदारांसह ‘वीकेंड’ला खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ झाली. रविवारीही शहरात मध्यम ते जोरदार आणि घाट विभागात अत्यंत जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. घाट विभागासाठी ‘रेड अलर्ट’ही विभागाने दिला आहे.

८. जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाने (पीडीपी) शनिवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात कलम ३७० आणि ३५ए फेरस्थापनेचे प्रयत्न आणि भारत आणि पाकिस्तानमधील राजनैतिक पुढाकार यांचा उल्लेख आहे. तसेच काश्मिरी पंडितांची खोऱ्यात सन्मानपूर्वक घरवापसी या मुद्द्यालाही स्थान देण्यात आले आहे.

९. गेल्या महिन्यात मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचे त्याची बालमैत्रीण राधिका मर्चंटशी लग्न केले. १२ ते १४ जुलैमध्ये रंगलेला हा शाही विवाहसोहळा अगदी नेत्रदिपक होता. या लग्नाची बरीच चर्चा झाली. लग्नाला अनेक देशाविदेशातील मान्यवर उपस्थित होते.

१०. भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज केएल राहुल सध्या त्याच्या निवृतीबद्दलच्या खोट्या अफवांवरुन चर्चेत आहे. राहुल परत एकदा चर्चेत आला ते म्हणजे त्यांने केलेल्या ‘कॉफी विथ करण’ वादाचा स्वत:वर झालेल्या परिणामावर भाष्य केले.

Source link

Maharashtra Political Newsmaharashtra times newstoday highlightsTop 10 Newsआजच्या ठळक घडामोडीटॉप १० बातम्यामहाराष्ट्र टाइम्स बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्या
Comments (0)
Add Comment