असा झाला घटनेचा उलगडा
मुलींच्या सुरक्षिततेसाठी, तक्रार समजून घेण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी मुलींना बाजूला घेऊन विश्वासात घेऊन विचारणा केली असता एका मुलीने आपल्या बाबतीत घडलेली धक्कादायक घटना सांगितली. तेव्हा ही संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने खाऊसाठी पैसे देण्याचे सांगून घरात नेऊन अत्याचार केल्याचं पीडित मुलीने सांगितले आहे. शिक्षिका, मुख्याध्यापक यांनी तातडीने याबाबत पालक शिक्षक संघातील सदस्यांशी चर्चा केली आणि हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.
पालकांच्या तक्रारीवरून सदर घटनेबाबत हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोप दिलीप नामदेव मते यास अटक करण्यात आली आहे. हवेली पोलीस पुढील तपास करत आहेत.
महाराष्ट्र आता बिहारच्या वाटेवर जायला लागलं की काय? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे. बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेनंतर शालेय शिक्षणमंत्री यांनी विशाखा समिती स्थापन केली आणि प्रत्येक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अजूनही संपूर्ण महाराष्ट्रातील जनता म्हणतेय की, त्या आरोपी नरधमाला म्हणजे अक्षय शिंदेला फाशी द्या. बीडमधील आष्टी तालुक्यातील कडा शहरातील जवळपास तीन हजार विद्यार्थीनींनी एकत्र येऊन कडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला आहे.