एवढ्या मोठ्या नेत्याला अशी विधाने करणे शोभत नाही; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार

नागपूर (जितेंद्र खापरे): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी विरोधकांकडून राज्य सरकारवर हल्लाबोल होत आहे. महाविकास आघाडी सातत्याने राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. या घटनेबाबत राष्ट्रवादी-सपाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल करत सरकारला भ्रष्टाचार कुठे आहे हेच समजत नाही. पवारांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. भ्रष्टाचाराचे समर्थन करता का, असा सवाल फडणवीस यांनी पवारांना केला. सोबतच एवढ्या मोठ्या नेत्याला, अशी विधाने करणे शोभत नसल्याचेही सांगण्यात आले.

काय म्हणाले पवार…

राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह बाळासाहेब थोरात, नाना पटोलेही उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी राजकोट किल्ला घटनेवरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला. शरद पवार म्हणाले, “सरकार कुठे भ्रष्टाचार करते हेच कळत नाही. सरकारच्या प्रचंड भ्रष्टाचारामुळे आज शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. राज्यात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे.”
Kangana Ranaut: पक्षाकडून तंबी दिल्यानंतर कंगना रनौत म्हणाली, काळजी घेईन; पण त्याआधी राहुल गांधींवर केले वक्तव्य

पवारांच्या वक्तव्यावर पलटवार करत फडणवीस म्हणाले, “माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. हा पुतळा नौदलाने बनवला आहे. तो राज्य सरकारने बनवला नाही हे त्यांना माहीत आहे. एका ठिकाणी भ्रष्टाचार होतो आणि दुसऱ्या ठिकाणी नाही असे कसे म्हणायचे. पवार साहेब इतर ठिकाणी भ्रष्टाचाराचे समर्थन करतात का? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य करण्यात येत आहे. हे शरद पवार यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभत नाही.
कौतुकास्पद! पतीची प्रेरणा घेऊन पत्नीचा अभिमानास्पद निर्णय, गावकऱ्यांनी वाजत गाजत काढली मिरवणूक

फडणवीस म्हणाले, “राजकोटची घटना सर्वांसाठीच अपमानास्पद आहे, ती खेदजनक आहे. त्याचवेळी जेव्हा अशी घटना घडते तेव्हा योग्य तपास व्हायला हवा. दोषींवर कारवाई व्हायला हवी. तिथे भव्य पुतळा बसवायला हवा. या तिन्ही गोष्टींवर कारवाई झाली पाहिजे.” नौदलाने तपास समिती गठीत केली असून दोषींवर कारवाई केली जाईल. फडणवीस पुढे म्हणाले, “पीडब्ल्यूडीने गुन्हा दाखल केला आहे. पोलिसही कारवाई करतील. नौदलाच्या मदतीने आम्ही भव्य पुतळा बसवू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. घटनेनंतर आम्हाला जे काही करायचे ते आम्ही करत आहोत.” पण त्याच वेळी, प्रत्येक गोष्टीचे राजकारण करू नये आणि अशा चुका होऊ नये.

राणे आक्रमक बोलतात, धमकी देत नाही

नारायण राणेंनी दिलेल्या वक्तव्यावर फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. नारायण राणे यांची बोलण्याची पद्धतही तशीच असल्याचे ते म्हणाले. ते आक्रमकपणे बोलतात पण मला वाटत नाही की ते धमक्या देत आहेत.

Source link

devendra fadnavis on sharad pawarmaharashtra politics latest newsmaharashtra politics newsmaharashtra politics news in marathiShivaji Maharaj Statue Collapsedछत्रपती शिवाजी महाराजांचे विचारदेवेंद्र फडणवीसदेवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवारराजकोट किल्लाशरद पवार
Comments (0)
Add Comment