मालवणच्या राड्यात शिवरायांच्या वैभवाला तडे, पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, ४२ जणांवर गुन्हा

चिपळूण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने संतापाची लाट उसळली असताना, यानिमित्ताने किल्ल्यावर आलेल्या शिवसेना (उबाठा) आणि नारायण राणे यांचे समर्थक बुधवारी एकमेकांना भिडले. दोन्ही बाजूंनी परस्परांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या वादात किल्ल्याच्या भिंतीवरील चिरे पडले. त्यानंतर मालवण पोलिसांकडून ४२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नावं माहिती असलेल्या ४२ जणांवर, तर शेकडो अज्ञातांवर विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन्ही गटांच्या समर्थकांचा समावेश आहे. विनापरवाना जमाव गोळा करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यासारख्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप मालवण किल्ल्यावर कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

राजकोटवरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याने घटनास्थळी पाहणीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे दुपारी बाराला किल्ल्यावर दाखल झाले. त्याच वेळी शिवसेना (उबाठा) आमदार आदित्य ठाकरेही किल्ल्यावर पाहणीसाठी पोहोचले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यांच्यासोबत होते.
निलेश राणेंचा पोलिसांना दम, मला समजवू नका, आदित्य ठाकरेंना आधी बाहेर काढा, राजकोट किल्ल्यावर राडा
आदित्य ठाकरे तिथे पोहोचताच राणे समर्थकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यास ठाकरे समर्थकांनीही प्रत्युत्तर दिले. त्यामुळे किल्ल्यावर तणावाची परिस्थिती बनली होती. जयंत पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

पाटील यांनी खासदार नारायण राणे आणि निलेश राणे यांना समजावण्याचा प्रयत्न केला. ‘आधी त्यांना बाजूला करा, आम्ही त्यांच्यानंतर जाऊ. आम्ही स्थानिक आहोत. ते बाहेरून आले आहेत’, असा पवित्रा नीलेश राणे यांनी घेतला. नारायण राणेंनीही ‘आम्ही इथून हटणार नाही, पोलिसांना गोळ्या घालायच्या असतील तर घालाव्यात’, अशी कठोर भूमिका घेतली.
Maharashtra Congress Survey : काँग्रेससाठी खुशखबर, अंतर्गत सर्व्हेत मोठा भाऊ ठरण्याचा अंदाज, ठाकरे गटाला किती जागा?
राणे पितापुत्रांशी बोलल्यानंतर जयंत पाटील यांनी आदित्य ठाकरे आणि त्यांच्यासोबतच्या नेत्यांशी संवाद साधला. मात्र, ठाकरे गटानेही आक्रमक भूमिका घेतली. ‘पोलिसांनी मुख्य रस्ता मोकळा करावा, आम्ही मागच्या रस्त्याने जाणार नाही’, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली. कोणीच माघार घेण्यास तयार नसल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राजकोट येथील महाराजांच्या पुतळ्याबाहेर उभारण्यात आलेल्या भिंतीचा चिरा आतमधून खाली पाडण्याचा प्रयत्न केला. बाहेर उभ्या असलेल्या राणेंच्या कार्यकर्त्यांनीही पोलिसांसमोरच आक्रमक पवित्रा घेत लाकूड, पाण्याची बाटली व दगड भिरकावून प्रत्युत्तर दिले.

Source link

Aaditya Thackeray vs Nilesh RaneMalvan Fort Ruckussindhudurg newsआदित्य ठाकरे निलेश राणे गोंधळमालवण राडाशिवाजी महाराज पुतळा कोसळलासिंधुदुर्ग राजकोट किल्ला राडा
Comments (0)
Add Comment