विनानिविदा कामाची मर्यादा दहा लाखापर्यंत वाढवण्याची घोषणा; बेरोजगार सेवा संस्थांना राज्य सरकारचा दिलासा

State Govt Decision: राज्य सरकारने बेरोजगार सेवा संस्थांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या संस्थांसाठी विनानिविदा कामाची मर्यादा १० लाखापर्यंत वाढवण्याची घोषणा मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स
म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई

राज्यात कार्यरत असलेल्या बेरोजगार सेवा संस्थांसाठी विनानिविदा कामाची मर्यादा दहा लाखापर्यंत वाढवण्याची घोषणा बुधवारी महाराष्ट्राचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली. या कामाची मर्यादा या आधी तीन लाखांपर्यंत होती, ती मर्यादा दहा लाखापर्यंत वाढवण्याची घोषणा लोढा यांनी यावेळी केली.

या निर्णयाबाबत बोलताना मंत्री लोढा म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून विविध प्रकारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. आजवर रोजगार निर्मितीसाठी महारोजगार मेळावे, पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सारख्या सर्वंकष योजना तयार झाल्या आहेत. त्याच अनुषंगाने आज करण्यात आलेली घोषणा अतिशय महत्वाची आहे. आता बेरोजगार सेवा संस्थांना स्वतःच्या कामाचा आवाका वाढवता येईल, त्यातून नवीन संधी निर्माण होतील आणि पर्यायाने रोजगार निर्मिती होईल. रोजगार संपन्न समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी आजचा निर्णय अतिशय महत्वाचा ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखविला.
NCP Protest: आपटेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; अमोल मिटकरींचा सरकारला घरचा आहेर

महाराष्ट्रात २०२३ अखेर दोन हजार पेक्षा जास्त संस्था कार्यरत असून, त्यामध्ये ३५ हजार पेक्षा जास्त सदस्य आहेत. इतर संस्थांच्या तुलनेत बेरोजगार सेवा संस्थांना मिळणाऱ्या कामांची संख्या कमी असल्याने विनानिविदा मिळणाऱ्या कामांची मर्यादा तीन लाखांपासून १० लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी केली गेली होती. त्या अनुषंगाने कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज महत्वपूर्ण घोषणा केली आहे.

राज्यातील अनेक संस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले असून आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या निर्णयाचा फायदा बेरोजगार संस्थाना नक्कीच फायदेशीर ठरेल असा विश्वास या निमिताने राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी व्यक्त केला.

– बेरोजगार सेवा संस्थांना राज्य सरकारचा दिलासा
– विनानिविदा १० लाखापर्यंतची कामे घेता येणार
– मंत्री मंगल प्रभात लोढा यांची महत्वपूर्ण घोषणा

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

unemployed service organisationsबेरोजगार सेवा संस्थामंगल प्रभात लोढामहाराष्ट्र राज्य सरकारमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Comments (0)
Add Comment