Sharmila Thackeray : पोकळ पुतळा समुद्रकिनारी कोण उभा करतो? शर्मिला ठाकरे संतापल्या

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 29 Aug 2024, 6:51 pm

Sharmila Thackeray Shivaji Maharaj Statue Collapse : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेवरून राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. अशातच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई : मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला आहे. यावरून राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विरोधकांनी या घटनेवरून राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. तसेच राज्यातील विविध शिवप्रेमी संघटनांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. अशातच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील राज्य सरकारवर टीका केली आहे. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना शर्मिला ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना तरी सोडा

शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, ”ताशी ४५ किलोमीटर वेगाने वारा आला म्हणून महाराजांचा पुतळा पडला हे ऐकून खूप दु:ख होतंय. त्याच राजकोट किल्ल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला हा अजूनही उभा आहे. महाराजांचे इतके गडकिल्ले आहेत. ते त्यापेक्षा जास्त वारा सोसत असतात. तरी देखील ते अजूनही उभे आहेत. त्यामुळे तुम्ही आता शिवाजी महाराजांना तरी सोडा.” अशी टीका केली आहे.

पोलीसांनी वाकड्यात जावू नये, सरकार कोणाचे आहे बघावे; आमदार नितेश राणेंचा थेट अधिकाऱ्यांना दम

कोकणातील लोक कोणत्या रक्ताचे आहेत

शर्मिला ठाकरे पुढे म्हणाल्या की, ” मुंबई- गोवा रस्त्यासाठी आम्ही आंदोलन करून थकलो आहोत. मुंबई – नाशिक रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. कोकणातील लोक कोणत्या रक्ताचे आहेत? जे अजूनही त्यांनाच मतदान करतात. जो पुतळा पडला तो संपूर्ण पोकळ होता. असा पोकळ पुतळा समुद्रकिनारी कोणी उभं करत का? असा सवाल उपस्थित केला आहे.

अमोल मिटकरींचा सरकारला घरचा आहेर

सत्ताधारी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ” राज्यात महाराजांचे अनेक पुतळे 50 वर्षांपासून दिमाखात उभे आहेत. शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राची अस्मिता नाही तर संपूर्ण जगाची अस्मिता आहे. महाराजांचा पुतळा तीन महिन्यात घाईघाईत का उभारला? आपटे यांनी तयार केलेल्या पुतळ्यामध्ये त्रुटी आहेत. महाराजांच्या भुवयांच्या वर खोप दाखवल्या गेली आहे. ती खोप का दाखवली हे स्पष्ट झालं पाहिजे आणि आपटेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे.

लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Maharashtra Political NewsMaharashtra politicsRaj Thackeray NewsSharmila Thackerayshivaji maharaj statueमालवणराजकोट किल्लाशिवाजी महाराज पुतळाशिवाजी महाराज पुतळा विटंबना
Comments (0)
Add Comment