Bachchu Kadu on Uddhav Thackeray Shiv Sena : लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुस्लीम समाजाची मतं ठाकरेंनी घेतली होती, विधानसभेतही तेच चित्र राहील, असा अंदाज बच्चू कडू यांनी वर्तवला आहे.
Bachchu Kadu on MVA : काँग्रेसकडे चेहरा नाही, उद्धवजींना पुरेपूर फायदा, बच्चू कडूंचं स्पष्ट मत, ठाकरेंबाबत मोठं भाकित
काँग्रेसकडे राज्यात सध्या चेहरा नाही, त्याचा पुरेपूर फायदा उद्धव ठाकरेंना होतोय. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुस्लीम समाजाची मतं ठाकरेंनी घेतली होती, विधानसभेतही तेच चित्र राहील, मुस्लीम पुन्हा ठाकरेंकडेच वळतील, असा अंदाज बच्चू कडू यांनी वर्तवला आहे.
काँग्रेसचा मतदार ठाकरेंकडे वळाला
काँग्रेसचे हक्काचा मतदार ठाकरे गटाकडे वळतोय हे चित्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी पाहायला मिळालं. महाविकास आघाडी न झाल्यास काँग्रेसचा मतदार ठाकरेंकडे गेलेला असेल, असं सांगतानाच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची महाविकास आघाडी एकत्र लढली, तरी फायदा उद्धव ठाकरेंनाच होईल, असं मतही बच्चू कडू यांनी व्यक्त केलं.
BJP leader joins Congress : भाजपला नाना पटोलेंचा पुन्हा धक्का, कल्याणमधील बडा मोहरा फोडला, रात्री उशिरा काँग्रेस प्रवेश
छ. संभाजीनगरमध्ये मत विभाजन
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा कमी होता, त्यामुळे जागा वाटपात अडचणी येणार, असं बच्चू कडू म्हणाले. छत्रपती संभाजीनगर येथील मुस्लीम मतं एमआयएमला गेल्यामुळे महायुतीची जागा आली, असं सांगत मुस्लीम मतदारांचं ठाकरे गट आणि एमआयएममध्ये विभाजन झाल्याचं कडू यांनी सुचवलं.
महाविकास आघाडीने मुस्लिम समाजाच्या भूमिकेचा फायदा घेतला, भाजपला त्याचाच फटका बसला. सध्या पक्ष आणि नेते मोठे होत आहेत, पण देशाची परिस्थिती ढासळत चालली आहे, असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं. लोकसभा निवडणुकांच्या वेळी पाहायला मिळालेला ट्रेंड कायम राहू शकतो, पण विधानसभेत मतं तुलनेने कमी असतात, त्यामुळे फरक दिसेल, असा अंदाजही कडू यांनी वर्तवला.