महाराजांनी भ्रष्टाचार, निष्काळजीपणाला माफी दिली नाही; मोदीजी, प्रायश्चित अटळ आहे- शरद पवारांच्या जवळच्या व्यक्तीची टीका

Jayant Patil Reaction On PM Narendra Modi Apologise: छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितल्यानंतर आता त्यावर विरोधीपक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत.

महाराजांनी भ्रष्टाचार, निष्काळजीपणाला माफी दिली नाही; मोदीजी, प्रायश्चित अटळ आहे- शरद पवारांच्या जवळच्या व्यक्तीची टीका

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्याजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर ४ दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली. पालघर येथे एका कार्यक्रमात बोलताना मोदींनी ही माफी मागितली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पालघर येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हात जोडले आणि नतमस्तक होऊन माफी मागितली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सर्वप्रथम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली होती. त्यानंतर काल गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली होती आणि आज पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली. मोदींच्या या माफीची सर्वत्र चर्चा होत असताना आता त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींच्या या माफीवर खोचक टीका केली आहे.

एक्सवर लिहलेल्या पोस्टमध्ये जयंत पाटील म्हणतात, भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो. त्यामुळे साहेब, महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही. प्रायश्चित अटळ आहे. जय शिवराय
जयंत पाटील यांनी केलेल्या या पोस्टमधून त्यांना मोदींसह महायुतीला हाच इशारा द्यायचा आहे की, आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही. या घटनेचे प्रायश्चित अटळ आहे, म्हणजेच विधानसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव निश्चित आहे असेच पाटील सुचवायचे आहे.

महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावण आणखी तापले आहे. आधीच बदलापूर आणि अन्य ठिकाणी झालेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनेमुळे राज्य सरकारवर टीका होत आहे. अशात पुतळा कोसळल्यानंतर विरोधक अधिकच आक्रमक झाले आहेत. मालवण येथे राणे समर्थक आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यात राडा देखील झाला. आता एक सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीने मुंबईत जोडे मारो आंदोलन पुकारले आहे.

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

chhatrapati shivaji maharaj statue collapsejayant patil reaction on pm modi apologisemaharashtra politics latest newsmaharashtra politics newsmaharashtra politics news in marathiछत्रपती शिवाजी महाराज पुतळाजयंत पाटील बातमीपंतप्रधान नरेंद्र मोदीपंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली माफीराजकोट किल्ला
Comments (0)
Add Comment