Nanded News: नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील लालवंडी येथे एका प्रियकराने विवाहित महिलेची हत्ये केली आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
नायगाव तालुक्यातील लालवंडी येथील सतीष रामराव आलेवाड हा नांदेड शहरातील एका खाजगी रक्तपेढी मध्ये कामाला होता. याच ठिकाणी नोकरी करणाऱ्या विवाहित महिलेसोबत त्याचे अनैतिक संबध जुळले. सदरच्या विवाहित महिलेला दोन मुलीही आहेत. काही वर्ष त्यांचा काळ सुखाने गेला, मात्र त्यांच्यात कटूता निर्माण झाली. दोघात नेहमी वाद होतं होते. शनिवारी पहाटे सतीष हा गावाकडून नांदेड शहराकडे आला.
त्यानंतर त्याने बंदाघाट येथील नदी घाटावर बोलवला. महिला देखील त्याला भेटण्यासाठी गेली. यावेळी दोघात वाद सुरु आणि या वादातून सतीष याने महिलेच्या पोटात चाकू भोसकून खून केला. घटनेनंतर तो मोटारसायकलने पसार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
घटनेनंतर आरोपी हा आपल्या गावी लालवंडी पोहचला. शेतात जाऊन त्याने एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सतीष तरुणाने गळफास का घेतली हे सुरुवातीला कोणालाच समजत नव्हतं, मात्र पोलीस मोबाईल लोकेशनच्या आधारे गावात पोहचले तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. देवाणघेवाण वरुन त्यांच्यात वाद सूरु होते, अशी माहिती आहे.
दरम्यान, घटनेनंतर सतीष आलेवार याने आपल्या एका मित्राला फोन करुन खुन केल्याचं सांगितले. मी ही आत्महत्या करणार आहे, असे देखील त्याने आपल्या मित्राला सांगून फोन बंद करुन टाकला. या घटनेने खळबळ उडाली आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.