Chhatrapati Shivaji Maharaj statue Collapse: छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या विरोधात आज महाविकास आघाडीने जोडे मारो आंदोलन पुकारलं आहे. यावेळी संजय राऊतांनी महायुती सरकारला फटकारलं आहे.
महायुती सरकारमध्ये वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जातो. माजी राज्यपाल कोश्यारी यांनीही अपमान केला होता, पण माफी मागितली नाही. मंत्र्यांनी राजेंचा अपमान केला पण माफी मागितली नाही. केसरकर म्हणतात दु:ख कशाला, वाईटातून चांगलं घडतं. ही विकृती आहे. पंतप्रधानांनी याप्रकरणी माफी मागितली, तो त्यांचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री आणि अजित पवारांनीही माफी मागितली. पण, म्हणून तुम्ही महाराष्ट्राल संताप व्यक्त करण्यापासून थांबवू शकत नाही
तुमचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आहे. लोकशाहीत अशा आंदोलनाला परवानगी द्यावी लागते. जर तुम्ही परवानग देणार नसाल तर ही दडपशाही, झुंडशाही आहे. जिथे आंदोलन होत आहे त्या भागात सुट्टी आहे, तरी परवानगी देत नाही. यांची हुकूमशाहीची धुंदी वाढली आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी सरकारला सुनावलं.
आम्ही तर फक्त जोडे मारो आंदोलन करतोय, जर छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असता तर तुमचा कडेलोट केला असता. आम्ही आंदोलन करतोय, म्हणून भाजपवाले आंदोलन करत आहेत, हा मूर्खपणा आहे. आम्ही शिवरायांच्या प्रतिष्ठेसाठी आंदोलन करत आहोत. तुम्हाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा हक्क नाही, असेही संजय राऊत म्हणाले.