Ratnagiri : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची ऊंची वाढवा, मनसेकडून मागणी

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 1 Sept 2024, 10:30 pm

shivaji maharaj statue : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड भरणा नाका येथील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची महामार्गावरील पुलापेक्षा कमी असल्याने अप्रिय घटना घडू शकते. अशी भीती मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
रत्नागिरी : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. राज्य सरकारवर विरोधक जोरदार टीका करत आहेत. अशातच आता मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड भरणा नाका येथील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची महामार्गावरील पुलापेक्षा कमी असल्याने अप्रिय घटना घडू शकते. अशी भीती मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणातील नव्या पुलाच्या उभारणीनंतर आता हा अत्यंत महत्त्वाचा असलेला मुद्दा समोर आला आहे.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक सुरू असते. भरणे नाका येथील पुलाच्या बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. मात्र, आता महाराजांच्या पुतळ्याची एकतर उंची वाढवावी किंवा हा पुतळा येथून स्थलांतरित करून खेड नगरपरिषद हद्दीत लावावा. अशी मागणी मनसेचे राज्य सरचिटणीस खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांनाही अशा स्वरूपाचे निवेदन देण्यात आले आहे.
Jitendra Awhad : महाराजांनी सूरत लुटली नव्हती फडणवीसांचे विधान, जितेंद्र आव्हाड संतापले

पालकमंत्री उदय सामंतानी दिले आश्वासन

उद्योगमंत्री तसेच पालकमंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले आहे की. ”खेड येथील शिवसेना पदाधिकारी यांच्याजवळ चर्चा झाली आहे. लवकरच येथील स्थानिक नागरिकांशी चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यास सांगितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा खेड भरणे नाका येथे अपेक्षित आहे हे काम आम्ही नक्की करू”. असं आश्वासन सामंत यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली माफी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेवरून माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो. असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. तसेच लवकरात लवकर नवीन पुतळा उभारण्यात येईल. असं आश्वासन देखील राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.

लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Mumbai Goa highwayrantagiri-sindhudurg constituencyRatnagiri newsshivaji maharaj statueरत्नागिरी ताज्या बातम्यारत्नागिरी बातम्याशिवाजी महाराज पुतळा
Comments (0)
Add Comment