Nana Patekar : उदय, शेवटी तू कोण, कुठल्या पक्षाचा याला महत्त्व नाही! नाना पाटेकरांची चौफेर फटकेबाजी

Nana Patekar : आम्हीच नाही तर आमची मुलेही तुला मत देतील त्यांची मुलही तुला मत देतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्याकडून उदय सामंतांवर कौतुकाचा वर्षाव

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
नाना पाटेकरांची उदय सामंतांवर चौफर फटकेबाजी
रत्नागिरी, प्रसाद रानडे : उदय, शेवटी तू कोण, कुठल्या पक्षाचा याला याला आमच्या दृष्टीने महत्त्व नाही. तू आमच्यासाठी काय करतोस हे महत्त्वाचं आहे. त्यातील सातत्य तू टिकवलस तर असं म्हणता येईल की आम्हीच नाही तर आमची मुले तुला मत देतील. त्यांची मुल सुद्धा मत देतील. ज्येष्ठ अभिनेते आणि परखड बोलणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले नाना पाटेकर यांनी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्या पालकमंत्री उदय सामंत यांच्या कामाच कौतुक केल आहे. ‘उदय पर्व’ या कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी पाटेकर बोलत होते. रत्नागिरी येथील वि.दा.सावरकर नाट्यगृहाच्या सभागृहात आयोजित या सोहळ्याला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटे,उद्योगपती दीपक गद्रे कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, मंत्री उदय सामंत यांचे वडील उद्योगपती अण्णा सामंत,भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे आदी उपस्थित होते

नाना पाटेकर पुढे म्हणाले की, आजपर्यंत मला कोणी जात धर्म विचारला नाही. त्याचं कारण हे आहे की माझी जात ही कलावंताची आहे. मला जितकं काही छान करता येईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न करीत राहणार आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला ते आवडत राहील तोपर्यंत तुम्ही या थिएटरमध्ये मला पाहायला येणार. पन्नास वर्षे होऊन गेली. मी नाटकात सिनेमात काम करतोय. पन्नास वर्षे या स्वभावासकट आणि या क्षेत्रात टिकून राहणं सोपे नाही, मी स्वभावाने अतिशय विचित्र आहे, तिरसट आहे. रागावतो बोलतो, पण मला असं वाटतं की नट म्हणून मी ज्यावेळी ते काम करतो त्यावेळी मी माझा जीव ओतायचा असतो.

रत्नागिरी हे माझं आजोळ आहे. माझी आई इथली. आई खूप शिव्या द्यायची ती सवय कदाचित मला लागली असेल. मग मी कधी कधी सांगतो ती माझी मदर टंग आहे. ज्यावेळी तू सुरुवात केलीस राजकारणी म्हणून, त्यावेळी नेमकं काय करायचं याची कल्पना नसते. मी नाटकात आलो आणि आमच्या नशिबाने आमच्या आजूबाजूला विजयाबाई, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, उमाकांत देशपांडे अशी दिग्गज मंडळी मिळाली. त्यामुळे त्यांचं बोट धरून आम्ही चालू लागलो परंतु आम्हाला माहितीच नाही की त्यानी कधी बोट काढून घेतलं आणि आम्ही स्वतःच्या पायावर चालू लागलो. पण ती फार मोठी दिग्गज मंडळी होती. तू राजकारणात आल्यावर तुझ्या वाट्याला कोण नेमकी माणसं आली हे मला माहिती नाही. पण निश्चितपणे छान, चांगली माणसंच वाट्याला आलेली असणार हे नक्की. आई-वडिलांचे संस्कार होते. आजूबाजूला शेकडो मंडळी उभी होती. तुला कोणी काही गूळ खोबरे दिले नव्हतं …हे खा …राजकारणी हो. त्यामुळे यापुढेही चांगले काम करीत जा…ही जनता पाठीशी राहील, नक्की पाठीशी राहील. असेही नाना पाटेकर म्हणाले.

गोष्ट खोटी आढळली तर जाहीररित्या बोलेन…

मी या कार्य अहवाल प्रकाशनाच्या कार्यक्रमाला यायच्या आधी उदयला पहिल्यांदाच सांगितलं होते की तू अहवाल जर प्रसिद्ध करत असशील आणि त्याच्यातील एक जरी गोष्ट मला खोटी आढळून आली तर मी त्यावर जाहीर रित्या बोलेन आणि ते चालणार असेल तर मला कार्यक्रमाला बोलावं. म्हणून त्याने अहवालाची ही चित्रफीत बनवून घेतली. असा अहवाल सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रत्येकाने जनतेला सादर करायला हवा. विरोधी पक्षाला सुद्धा आम्ही मत दिली, म्हणून ते विरोधी पक्षाचे नेते झाले. त्यामुळे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्या कारकिर्दीत काय केलं हे लोकांना कळायला हवे. हे केवळ “उदय” पुरत मर्यादित राहता कामा नये. कारण सरतेशेवटी तुम्ही सर्व आमच्यासाठी आहात. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आपल्या कामाचा अहवाल जनतेला सादर करणे आवश्यकच आहे, असे मत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी रत्नागिरी येथे बोलताना व्यक्त केले.

रत्नागिरी येथे मेडिकल कॉलेज अभियांत्रिकी कॉलेज स्किल सेंटर, टाटा समूहाचे स्किल सेंटर लोकमान्य टिळक वाचनालय, तारांगण, छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा आधी केलेल्या कामांची सामंत यांनी माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेली व व्यासपीठावरील उपस्थित सगळी मंडळी आपल्या प्रेमापोटी आली असून तुमचं हे माझ्यावर असलेले प्रेम हीच माझी राजकीय संपत्ती आहे अशा शब्दात सामंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

लेखकाबद्दलप्रतीक्षा बनसोडेपत्रकारिता क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सध्या डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी डीडी नॅशनल, लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून काम केले आहे. झी २४ तासमध्ये डिजीटल टीममध्ये काम केलं आहे. राजकीय आणि सामजिक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

uday parv of uday samantuday samant speechउदय पर्वउदय सामंतउदय सामंत मंत्रीनाना पाटेकरनाना पाटेकर ऑन उदय सामंतरत्नागिरीरत्नागिरी विधानसभा निवडणुका
Comments (0)
Add Comment