Violence Against Women: ‘कट कट कट’ डायरेक्ट कटिंग करून टाकायची, याशिवाय नराधम सरळ होणार नाहीत; अजित पवार पुन्हा बोलले

Ajit Pawar On Violence Against Women: बारामती येथे जनसन्मान यात्रेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा महिला अत्याचारांच्या घटनाबाबत अशा नराधमांना फाशीची शिक्षा होण्याच्या आधीच बंदोबस्त करा अशा कठोर शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
बारामती (दीपक पडकर) : महिला अत्याचारांच्या घटनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलांचा सन्मान कसा केला जातो. हे आपण इतिहासात पाहिले आहे. आज महिलांवर जे अत्याचार होत आहेत. तो अक्षम्य गुन्हा आहे. त्यात कोणालाही माफी नाही. कोणालाही सोडले जाणार नाही. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. महिला सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असेल. महिलांवर अत्याचार करणारी माणसे असलीच नाही पाहिजेत. माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या अशा नराधमांना फाशीच दिली गेली पाहिजे. फाशी द्यायला वेळ लागतो. मात्र फाशी होईपर्यंत असा बंदोबस्त करायचा की, पुन्हा त्याला तसं करताच आलं नाही पाहिजे. ‘कट कट कट’ डायरेक्ट कटिंग करून टाकायची. याशिवाय नराधम सरळ होणार नाहीत. अशा कठोर शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांचा समाचार घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची आज बारामतीत जनसमान यात्रा आली होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. त्यांच्या समवेत खासदार सुनील तटकरे, खासदार सुनेत्रा पवार, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, अजित पवारांचे पुत्र जय पवार पार्थ पवार ही यावेळी उपस्थित होते.
प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी नितेश राणेंविरूद्ध गुन्हा दाखल; म्हणाले होते, कोणी मस्ती केली तर किड्या-मकोड्यासारखे मारू

दादांनी पोलिसांना ‘टाईट’ केले आहे

Violence Against Women: ‘कट कट कट’ डायरेक्ट कटिंग करून टाकायची, याशिवाय नराधम सरळ होणार नाहीत; अजित पवार पुन्हा बोलले

पुढे पवार म्हणाले की,समाजातील महिला, मुलींना कोणी त्रास देत असेल तो कितीही मोठ्या बापाचा असो. अजिबात त्याचा ‘लाड’ चालणार नाही. पालकांनो तुम्हीही आपल्या मुलांना नीट समजवा. महिला मुलींची छेड काढू नका. दादांनी पोलिसांना ‘टाईट’ केले आहे.टाईट केल आहे म्हणजे. महिला मुलींची कोणी छेड काढत असेल तर तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असू द्या.. त्याला सोडायचं नाही कायदा सर्वांना सारखा..असं अजित पवार यावेळी म्हणाले.
जातीनिहाय जनगणनेवर RSSचे मोठे वक्तव्य; संवेदनशील मुद्दा, निवडणुकीतील उद्देशांसाठी त्याचा वापर नको

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांबद्दल अजित पवारांनी अशा पद्धतीने बोलण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी बदलापूर येथील शाळेत झालेल्या घटनेनंतर जळगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना अजितदादांनी अशा विकृत व्यक्तींचे सामानच काढून टाकले पाहिजे असे म्हटले होते.

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

ajit pawar latest newsajit pawar on violence against womenajit pawar on Women safetyNationalist Congress Partyअजित पवारअजित पवार महिला अत्याचारावर बोललेउपमुख्यमंत्री अजित पवारमहिला सुरक्षितताराष्ट्रवादी काँग्रेस जनसन्मान यात्रा
Comments (0)
Add Comment