Kolhapur : देशाच्या सहकार क्षेत्रात महिलांचे विशेष योगदान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गौरवोद्गार

Kolhapur : महिलांची प्रगती ही देशाच्या उन्नती आणि विकासामध्ये महत्वाची आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची कोल्हापूरात प्रतिक्रिया. वारणा समूहाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला राष्ट्रपतींची हजेरी, तरुणांना केले उद्योजक बनण्याचे आवाहन.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
राष्ट्रपती द्रुपदी मुर्मू यांनी महिलांच्या योगदानाचे कौतुक केले
नयन यादवाड, कोल्हापूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज कोल्हापूर दौऱ्यावर होत्या, यावेळी वारणानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या वारणा महिला सहकारी उद्योग समूहाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि वारणा विद्यापीठाच्या शुभारंभप्रसंगी राष्ट्रपती मुर्मू यांनी महिला आणि सहकार यावर बोलताना लोकशाही व्यवस्थेमध्ये सहकारी संस्था मोलाचं योगदान अधोरेखित केले. सहकार चळवळीच्या माध्यमातून अनेक महिलांना संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करत अनेक महिला स्वावलंबी बनल्या, गेली ५० वर्ष कार्यरत असलेल्या वारणा समूहाच्या माध्यमातून महिलांचं सामाजिक स्थान वाढलं, ही कौतुकाची गोष्ट आहे असं गौरवोद्गार राष्ट्रपतींनी काढले.

युवा पिढीने मोठ्या संख्येने सहभाग घ्यायला हवा

स्वातंत्र्यानंतर कोल्हापूर जिल्हा सहकाराची पंढरी बनला, याच जिल्ह्यातील वारणा उद्योग समूहाच्या सोहळ्याला येण्याचा आनंद आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. महिलांची ही प्रगती ही देशाच्या उन्नती आणि विकासामध्ये महत्वाची आहे. महिलांच्या दैनंदिन जीवनात सहकारामुळे अनेक सकारात्मक बदल होतं आहे. आपल्या सोबतच्या सर्व महिलांना याच प्रगतीच्या पथावर आणणे गरजेचं आहे. लिज्जत पापड सारखे घराघरात जाणारे ब्रँडचे प्रॉडक्ट इथं बनले जातात, दुग्ध उत्पादनातही वारणा समूह पुढे आहे, आता युवा पिढीनेही यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यायला हवा, अनेकांच्या हाताला काम देणाऱ्या यासाठीच सरकार प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती मुर्मू यांनी नारीशक्तीला संबोधित करताना केलं.

कोल्हापुरी साज अन् पैठणी सोबतच ‘विशेष तैलचित्र’ राष्ट्रपतींना भेट

कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रपती द्रौपती मुर्मु यांना वारणा समूहाकडून खास भेटवस्तू देण्यात आल्या. अस्सल कोल्हापुरी साज, पैठणी यासह छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात महिलांची उपस्थिती दर्शविणारे आणि खास महिलांनी रेखाटलेले तैलचित्र राष्ट्रपतींना भेट म्हणून घेण्यात आलं. या सोहळ्याला राज्यपाल सीपी राधाकृष्णन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने,आमदार विनय कोरे, निपून कोरे, शुभलक्ष्मी कोरे यांची सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती.

तात्यासाहेब कोरे यांना पद्म पुरस्कार देण्यासाठी शिफारस करणार

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वारणा उद्योग समूहाचा कौतुक करताना सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे हे दूरदृष्टीचे नेते होते. यामुळे त्यांनी ५० ते ६० वर्षांपूर्वी महिलांच सक्षमीकरणांमध्ये भागीदारी जास्ती असायला हवी हे विचार करून त्यांनी महिलांसाठी उद्योग उभा केला. त्यांच्याप्रमाणे विनय कोरे देखील अत्यंत शांतपणे क्रांती घडवणारे व्यक्तिमत्व आहे त्यांचा स्वभाव शांत आहे. मात्र शांतीतून क्रांती कशी करायची हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. तात्यासाहेब कोरे यांना आपण सहकार महर्षी म्हणतो. मात्र त्यांना पद्म पुरस्कार मिळाला पाहिजे होता ते राहून गेलं त्यामुळे सरकारच्या वतीने आम्ही तात्यासाहेब कोरे यांना सुवर्ण जयंती निमित्ताने पद्म पुरस्कार द्यावा, अशी शिफारस करणार असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.

लेखकाबद्दलप्रतीक्षा बनसोडेपत्रकारिता क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सध्या डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी डीडी नॅशनल, लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून काम केले आहे. झी २४ तासमध्ये डिजीटल टीममध्ये काम केलं आहे. राजकीय आणि सामजिक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

droupadi murmu on sahakar kshetradroupadi murmu on womens contributaionद्रोपदी मूर्मुमहिलाचे योगदानराष्ट्रपती द्रोपदी मूर्मुवारण समूह सुवर्ण वर्षसहकार क्षेत्र
Comments (0)
Add Comment