Marathwada Rain: मराठवाड्यात पावसामुळे ६३ गावे बाधित; दोन दिवसांत पाच जणांचा मृत्यू, पंचनाम्यांचे आदेश

Marathwada Rain Update: पावसामुळे जालना जिल्ह्यातील १५, परभणीतील २६, बीड जिल्ह्यातील १२, लातूर जिल्ह्यातील ९ तर हिंगोली जिल्ह्यातील एक गाव बाधित झाले आहे. तर आतापर्यंत लहान मोठे मिळून ३०० हून अधिक जनावरे दगावले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स
marathwada 5 death rain
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात दोन दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे ६३ गावे बाधित झाली असून, पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. तर आतापर्यंत २२५हून अधिक जनावरे दगावली आहेत, तर १५०हून अधिक घरांची पडझड झाली. दरम्यान, या पावसामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला असून, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

शनिवार रात्रीपासून मराठवाड्यात दमदार पावसाला सुरुवात झाली. रविवारी रात्री उशीरापर्यंत अनेक मंडळात अतिवृष्टी झाली. सोमवारी दिवसभरही विभागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. दरम्यान, दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी ओढे दुथडी भरुन वाहत असून अनेक ठिकाणी पुर स्थिती निर्माण झाल्याचे चित्र होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील मौजे खटखेडा येथील जिल्हा परिषदेची शाळा पुराच्या पाण्यात वेढल्या गेल्याने सोमवारी शाळेला सुट्टी देण्यात आली. गंगापूर तालुक्यातील मंगेगाव येथे एका घराची भिंत ढासळली. सुदैवाने त्यात कोणी जखमी झाले नाही. तर सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी गावाजवळ श्री रुद्रेश्वर नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात सकाळी एक चारचाकी वाहन वाहून गेले. सुदैवाने चालक घुगे थोडक्यात बचावले.

घराजवळ वाहणाऱ्या पाण्यात वाहून गेल्याने साई कडुबा बोरसे हा दीड वर्षाचा बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथे घडली. कन्नड तालुक्यातील माळीवाडा येथे पाण्यात वाहून संतोष थोरात (वय २८) हा तरुण पुरात वाहून गेला. संतोष बैलाला वैरण टाकण्यासाठी गेले होते. घरी परत येत असतानाच पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून जाताना ते वाहून गेले. फुलंब्री तालुक्यातील मौजे शेवता येथील रावसाहेब नाना बडके हा युवक पुरात वाहून गेला. सायंकाळी उशिरापर्यत शोधकार्य सुरू होते.

यासह जालन्यात तसेच हिंगोली जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला; लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील ढोरसांगवी गावालत असणाऱ्या ओढ्यावर म्हैस धुण्यासाठी गेलेल्या नरेश अशोक पाटील (वय २८) वाहुन गेल्याने त्याचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील आदित्य डोळस ( वय २१, रा. संत नामदेवनगर) या तरुणाचा नदीत बडून मृत्यू झाला.

दरम्यान, पावसामुळे जालना जिल्ह्यातील १५, परभणीतील २६, बीड जिल्ह्यातील १२, लातूर जिल्ह्यातील ९ तर हिंगोली जिल्ह्यातील एक गाव बाधित झाले आहे. तर आतापर्यंत लहान मोठे मिळून ३०० हून अधिक जनावरे दगावले आहेत. हिंगोली जिल्ह्यात ५६ जनावरे दगावले. नांदेड मध्ये १८, बीडमध्ये ६ तर जालना जिल्ह्यात ८ जनावरांचा मृत्यू झाला. तर परभणी जिल्ह्यात २०० हून अधिक जनावरांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. विभागात एकूण १६० हून अधिक घरांची पडझड झाली आहे. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. जालना जिल्ह्यात ४२ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज असून एकूण नुकसानीबाबत येत्या दोन ते तीन दिवसांत अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच, नदीकाठच्या गावांमध्ये विशेष खबरदारी घेण्याच्या आणि सर्व अधिकाऱ्यांनी फिल्डवर राहून तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे नमूद केले.
Nanded Rain Update: सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी; २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला फटका, २५ जनावरे मृत्युमुखी
परभणीत ‘एनडीआरएफ’चे पथक तैनात

जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील २३ गावांचा संपर्क तुटला असून, ‘एनडीआरएफ’चे पथक व जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जिल्हा प्रशासन व ‘एनडीआरएफ’चे पथक पूरस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले. सेलू तालुक्यात मौजे वाई बोथ येथे शेतात सहा जणांना पथकामार्फत सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. जिंतूर तालुक्यातील बोर्डी गावात एक व्यक्ती पुराच्या पाण्यात अडकला असून, सोनपेठ तालुक्यातील मौजे शेळगाव येथे सहा लोकांना रेस्कू करण्यात आले आहे.

जायकवाडी धरणात ९० टक्के पाणीसाठा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरण ९० टक्के भरले आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वत्र पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक वाढणार आहे. आवक विचारात घेऊन धरणामधुन गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येईल. त्यामुळे किनाऱ्यालगतच्या गावात सतर्कता बाळगणे व संभाव्य पूर व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे,असे निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जायकवाडी धरण येथे सोमवारी जात जलाशयाचे जलपूजन केले. तसेच अतिवृष्टी भागाची पाहणी करत त्यांनी पंचनामे तातडीने करा, असे निर्देश प्रशासनाला दिले.

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Maharashtra weathermarathwada flood victimsmarathwada rain news marathiMarathwada Rain Updatendrf rescue operationRain forecastWeather forecast todayछत्रपती संभाजीनगर बातम्यामराठवाडा हवामान अंदाजमान्सून अपडेट महाराष्ट्र
Comments (0)
Add Comment