Mumbai Dam Water Level: मुंबईकरांना मोठा दिलासा! सातही धरणं काठोकाठ भरली, कोणत्या धरणात किती पाणी?

Mumbai Dam Water Level : सध्या धरणक्षेत्रात रिमझिम पाऊस सुरू आहे. सात धरणांपैकी विहार आणि तुळशी तलाव १०० टक्के भरले आहेत. तर अन्य धरणे ९५ टक्केपेक्षा जास्त भरली आहेत.

महाराष्ट्र टाइम्स
vaitarna dame
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये जुलै महिन्यात दमदार पाऊस झाल्याने या धरणांतील पाणीसाठ्यात दिलासादायक वाढ झाली. सध्या सातही धरणांत ९७ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत धरणांमध्ये ९० टक्के पाणीसाठा होता. सध्या धरणक्षेत्रात रिमझिम पाऊस सुरू आहे. सात धरणांपैकी विहार आणि तुळशी तलाव १०० टक्के भरले आहेत. तर अन्य धरणे ९५ टक्केपेक्षा जास्त भरली आहेत.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणातून पाणी पुरवठा होतो. दमदार पावसामुळे २० जुलैला तुळशी तलाव आणि २४ जुलैला तानसा तलाव भरला होता. विहार धरण २४ जुलैच्या मध्यरात्री, त्यानंतर मोडक सागर धरणही याच दिवशी ओसंडून वाहू लागले. धरणे भरू लागल्याने मुंबई महापालिकेने १० टक्के पाणीकपात २९ जुलैपासून मागे घेतली होती. तर ठाणे शहर, भिवंडी आणि नगर बाह्य विभागातील ग्रामपंचायतींनाही मुंबई महापालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील कपात मागे घेतली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. आता हीच क्षमता १४ लाख २ हजार ९९९ दशलक्ष लिटर एवढी झाली असून ९७ टक्के धरणे भरली आहेत २०२३ मध्ये याच कालावधीत ९० टक्के धरणे भरली होती. तर २०२२ मध्ये ९८ टक्के पाणीसाठा होता. १ जुलै ते २५ जुलै या कालावधीत सात धरणातील पाणीसाठ्यात ६१ टक्क्यांनी वाढ झाली होती. ५ ऑगस्टनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने या धरणातील पाणीसाठ्यात फारशी वाढ झालेली नव्हती. त्यामुळे ९३ टक्के पाणीसाठा होता. मात्र गेल्या काही दिवसांत पुन्हा पाऊस आल्याने हा साठा ९७ टक्के पोहोचला आहे.

धरणातील पाणीसाठा टक्केवारी
अप्पर वैतरणा-९७ टक्के
मोडक सागर-९९ टक्के
तानसा-९८.२४ टक्के
मध्य वैतरणा-९९ टक्के
भातसा-९६ टक्के
विहार-१०० टक्के
तुळशी-१०० टक्के
मिस्ड कॉल देत PM मोदींनी पुन्हा घेतले भाजपाचे सदस्यत्व, नेमका काय आहे पक्षाचा सहा वर्षाचा नियम?
चोरी, गळतीची चिंता

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणाची पाणीसाठवण क्षमता ही १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर असून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची लोकसंख्या पाहता मुंबईची दैनंदिन पाण्याची गरज ही ४ हजार २०० दशलक्ष लिटर आहे. मात्र सध्या सात धरणातून होणारा पाणीपुरवठा हा ३ हजार ८५० दशलक्ष लिटर असला तरीही यातील २५ ते ३० टक्के पाण्याची चोरी, गळती होत असते. तर काही वेळा विविध विकासकामांमुळे जलवाहिन्यांचे नुकसान होऊन बरेच पाणी वाया जाते. त्यामुळे मुंबईकरांच्या वाट्याला पाणी कमी येते. पाणी चोरी, गळतीवर अद्यापही कायमस्वरूपी उपाय निघू शकलेले नाही

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

maharashtra dam water storagemodak sagar dammumbai dam water level todaywater level in damsअप्पर वैतरणाभातसा धरणमध्य वैतरणा धरणमुंबई बातम्यामुंबई महानगरपालिका
Comments (0)
Add Comment