लोकसभेला कामगिरी दमदार; भाजपनं विदर्भात उतरवले २९ पैकी २९ जागा जिंकणारे ४ शिलेदार

Maharashtra Assembly Election 2024: मध्य प्रदेशात लोकसभा निवडणुकीत भाजपनं २९ पैकी २९ जागा जिंकल्या. या विजयात ४ नेत्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांना आता भाजपनं विदर्भाची जबाबदारी दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
नागपूर: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला. दोन मोठ्या राज्यांमध्ये पिछेहाट झाल्यानं केंद्रात भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही. सरकार स्थापनेसाठी त्यांना एनडीएतील मित्रपक्षांच्या टेकूची गरज भासली. मध्य प्रदेशात मात्र भाजपची कामगिरी जोरदार झाली. राज्यातील लोकसभेच्या सगळ्याच्या सगळ्या २९ जागांवर कमळ फुललं. आता या विजयाच्या शिल्पकारांना महाराष्ट्र विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे.

मध्य प्रदेशात मोहीम फत्ते करणाऱ्या चौघांना भाजपनं महाराष्ट्रात महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. यातील तिघे मंत्री आहेत. कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे माजी जनरल सेक्रेटरी कैलाश विजयवर्गीय, मंत्री प्रल्हाद पटेल, विश्वास सारंग आणि माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा या चार नेत्यांची निवड मिशन महाराष्ट्र फत्ते करण्यासाठी नेतृत्त्वाकडून करण्यात आलेली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Elections: महायुतीला ७ जिल्ह्यांत भलामोठा भोपळा; विदर्भ, मराठवाड्यात फटका; चिंता वाढवणारा सर्व्हे
कैलास विजयवर्गीय यांच्याकडे नागपूर विभागाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. ते विदर्भात लक्ष घालतील. गेल्या आठवड्याभरात त्यांनी दोनदा नागपूरचा दौरा केला आहे. तर मंत्री प्रल्हाद पटेल यांच्याकडे वर्धा, अमरावती विभागाची जबाबदारी दिली गेली आहे. युवानेते विश्वास सारंग यांच्याकडे अकोला, बुलढाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रांना भंडारा, गोंदियाची जबाबदारी दिली गेली आहे.
Narayan Rane: मला उद्धवची विकेट काढायचीच होती! म्हटलं, साहेब भारी दिसताय! नारायण राणेंनी सांगितला किस्सा
विदर्भ मध्य प्रदेशला जोडून असल्यानं या भागातील जिल्ह्यांसाठी भाजपनं चार प्रमुख नेत्यांकडे विशेष जबाबदारी दिली आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपला विदर्भात घवघवीत यश मिळालं. पण यंदाच्या लोकसभेला विदर्भात भाजपला केवळ दोन जागा निवडून आणता आल्या. काँग्रेसनं थेट लढतींमध्ये भाजपच्या उमेदवारांना पाणी पाजलं. अकोला, नागपूर वगळता अन्य सगळ्या मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार पराभूत झाले.

Maharashtra BJP: लोकसभेला कामगिरी दमदार; भाजपनं विदर्भात उतरवले २९ पैकी २९ जागा जिंकणारे ४ शिलेदार

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं स्वबळावर लढत विदर्भातील ६२ पैकी ४४ जागांवर यश मिळवलं. २०१९ मध्ये हाच आकडा २९ वर आला आहे. आता लोकसभेला काँग्रेसनं विदर्भात मारलेली मुसंडी पाहता भाजपला विधानसभेला मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळेच लोकसभेला मध्य प्रदेशात २९ पैकी २९ जागा जिंकून आणण्यात सिंहाचा वाटा असलेल्या चार नेत्यांकडे भाजपनं मोठी कामगिरी सोपवली आहे.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

bjp maharashtraMaharashtra politicsnarrotam mishravishwas sarangकैलाश विजयवर्गीयप्रल्हाद पटेलमध्य प्रदेश भाजपतील नेत्यांकडे जबाबदारीमध्य प्रदेश लोकसभा निवडणूकविदर्भ भाजपविदर्भ विधानसभा निवडणूक
Comments (0)
Add Comment