सरकारला इशारा देणाऱ्या मनोज जरांगेंना मराठा नेत्यांकडून ‘अल्टिमेटम’; राज्यात सर्वांच्या भुवया उंचावल्या

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीकडून ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने काय भूमिका घ्यावी असा प्रश्न विचारत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मोठा फलक लावण्यात आला आहे. फलकात मनोज जरांगे पाटील यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
सोलापूर (इरफान शेख): सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मराठा समाज बांधवाने डिजिटल फलक लावत मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने काय भूमिका घ्यावी.महायुतीला पाठिंबा द्यावयाचा महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावयाचा?मराठा समाज विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संभ्रमात पडला आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी सांगितल्या प्रमाणे महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता.मात्र महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीनंतर मराठा आरक्षणाबाबत जाहिरपणे किंवा ठोस आश्वासन मिळाले नाही. जरांगे पाटील यांना प्रश्न विचारत बार्शी मधील अण्णासाहेब शिंदें या मराठा नेत्याने डिजिटल फलक लावले आहे.जरांगे पाटील यांनी खुलासा नाही केला तर,बार्शी मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटलांना मराठा नेत्याने दिला आठ दिवसांचा अल्टिमेटम

बार्शी तालुक्यातील मराठा नेते अण्णासाहेब शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या जाहीरनाम्यात मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याबाबत आश्वासन देण्यासाठी सांगणार का? असा सवाल अण्णासाहेब शिंदे यांनी उपस्थित केला आहे. अण्णासाहेब शिंदें इतरही प्रश्न उपस्थित केले आहेत.मनोज जरांगे पाटील यांनी आठ दिवसात याचे उत्तर न दिल्यास मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात उपोषण करणार असल्याचा इशारा बार्शी मधील अण्णासाहेब शिंदें या मराठा नेत्याने दिला आहे.
Sujay Vikhe: राणे नगरला आले, बोलून गेले; विखे पाटील म्हणाले… वातावरण कोणी बिघडविले तर माझ्याशी गाठ

अण्णासाहेब शिंदें यांचे डिजिटल फलकात प्रश्न

बार्शी मधील मराठा नेते अण्णासाहेब शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर किती दिवसात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार हे त्यांच्याकडून लिहून घ्या. मनोज दादा यापूर्वी मराठा-मुस्लिम वाद, मराठा-दलित वाद आणि आता मराठा ओबीसी वाद सुरू आहे. त्यामुळे आणखी किती जातींशी वैमनस्य घ्यायचे ते सांगा. देवेंद्र फडणवीस यांना हटवताना मराठा असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार पाडून आपण ब्राह्मण असलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवून मराठा समाजावर अन्याय करणार नाही का? असे प्रश्न अण्णासाहेब शिंदें यांनी उपस्थित केले आहेत.

Maratha Reservation: सरकारला इशारा देणाऱ्या मनोज जरांगेंना मराठा नेत्यांकडून ८ दिवसाचा ‘अल्टिमेटम’; राज्यात सर्वांच्या भुवया उंचावल्या

अण्णासाहेब शिंदेंच्या प्रश्नामुळे बार्शीतील मराठा समाजाच्या भुवया उंचावल्या

अण्णासाहेब शिंदें यांनी डिजिटल फलका मार्फत मनोज जरांगे पाटील यांना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.मनोज जरांगे पाटील यांनी पुढच्या आठ दिवसात या प्रश्नांचे निरसन न केल्यास बार्शी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा अण्णासाहेब शिंदे यांनी केला आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात तसेच या प्रश्नांची उत्तरे देण्यास ते यशस्वी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

manoj jarange patil maratha reservationmanoj jarange patil newsmaratha reservation updateमनोज जरांगे पाटीलमनोज जरांगेंना अल्टिमेटममराठा आरक्षणमराठा समाजमहाविकास आघाडीविधानसभा निवडणूक
Comments (0)
Add Comment