Maharashtra Assembly Election 2024: उद्योगमंत्री उदय सामंत हे कोणाचे झाले नाहीत. आता आगामी विधानसभा निवडणुकीत ते भाजपकडून निवडणूक लढवतील असे भाकीत राजन साळवी यांनी केले आहे.
मंत्री उदय सामंत यांना उद्धव ठाकरे यांनी आमदार केले, मंत्री पद दिले अजून काय करणार इतकच नाही तर चौथ्या टर्मवेळी आमच्या शिवसेनेमध्ये नाही म्हटलं तरी अनेक जण तोला मोलाचे होते. निवडून येण्यासारखी माणसं त्या भागामध्ये होती, पण केळ उद्धव साहेबांचा आदेश होता म्हणून उदय सामंत यांना त्या ठिकाणी निवडून दिले. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना शिवसेनेने आमदार केलं इतकच नाही तर त्यांना उच्च व तंत्र शिक्षण खात्याच मंत्रीपद ही उद्धव साहेबांनी दिल. हे होत नाही तोपर्यंत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून सामंत शिंदे गटामध्ये गेले शिंदे गटाकडून ते उद्योग मंत्री झाले.
आता पुन्हा एकदा 2024 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंत हे भाजपाच्या कमळाच्या चिन्हावरचे उभे असतील हे भाकीत तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो आहे, असा खळबळजनक दावा आमदार राजन साळवी यांनी माध्यमांजवळ बोलताना केला आहे. ते कोणाचेही होऊ शकत नाहीत, असा थेट आरोपच राजन साळवी यांनी केला आहे. परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून त्यांचा पराभव होईल, असा आपल्याला विश्वास असल्याचेही राजन साळवी यांनी म्हटले आहे.
जिल्हा नियोजनच्या समितीमध्ये आम्हाला आमदार म्हणून निधी असतो विविध हेडखाली हा निधी खर्च करायचा असतो. मात्र शिवसेना भाजपा राष्ट्रवादीचे सरकार आल्यानंतर आम्हाला आमच्या डोंगरी विभागाला मिळणारा एक कोटी रुपयांचा हक्काचा निधीही मिळालेला नाही इतकच नाही. तर अन्य मतदारसंघाकडे दुर्लक्ष करत पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून लांजा राजापूर मतदारसंघात सगळा निधी वळवला आहे. माझ्या राजापूर लांजा या मतदारसंघात निधी आल्याचा मला आनंदच आहे, विकास कामे होता आहेत चांगले आहे, पण आमदार म्हणून माझ्या सहमतीने हा निधी येणे अपेक्षित असते, तसा प्रोटोकॉल आहे. मात्र यामध्ये अनियमितता केल्याचाही आरोप राजन साळवी यांनी केला आहे.
Assembly Election 2024: उदय सामंत भाजपामधून विधानसभा लढवतील; ठाकरे गटाच्या आमदाराचे खळबळजनक भाकीत
राजन साळवी यांच्यावर आत्मक्लेष करण्याची वेळ येईल- उदय सामंत यांनी सुनावले
त्यांचे (साळवी) जे काही मत आहे ते आपण मनावर घेत नाही आणि ते मनावर घ्याव अशीही आपली इच्छा नाही आणि साळवी यांच्या मतावर माझं मत व्यक्त करून त्यांना मोठे करण्याची काही आवश्यकता नाही. आपण साळवी यांच्या आरोपाला फार किंमत देत नाही अशा स्वरूपाचे विधान केले आहे. इतकेच नाही तर उदय सामंतची जी विधानसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये काय काय नक्की झालं ते सांगितले तर त्यांच्यावर आत्मक्लेष करण्याची वेळ कधीतरी येईल, अशा शब्दात उदय सामंत यांनी त्यांनी साळवी यांना सुनावले.